शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

आचरेकर प्रतिष्ठानमुळे प्रायोगिक नाट्य चळवळीला गतवैभव - अमोल पालेकर

By admin | Updated: February 14, 2017 19:49 IST

नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक भाग होता. पूर्वीचे नाटकाचे वातावरण आता राहिलेले नाही. मात्र, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक

सुधीर राणे/ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 14 - नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक भाग होता. पूर्वीचे नाटकाचे वातावरण आता राहिलेले नाही. मात्र, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या प्रायोगिक नाट्योत्सवामुळे ते वातावरण पुन्हा निर्माण होवून मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीला गतवैभव मिळेल. कारण ते वातावरण आजही कणकवलीत आहे. असे मत रंगकर्मी अमोल पालेकर यांनी येथे व्यक्त केले.येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रायोगिक नाटयोत्सवाच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विख्यात हिंदी नाट्य- चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शहा , राज्यस्थानचे कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. अर्जुनदेव चारण , आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित आदी उपस्थित होते.यावेळी अमोल पालेकर म्हणाले, सन 1970-80 या दशकातील नाट्याचे वातावरण भारावून टाकणारे होते. ते वातावरण सध्या नक्कीच नाही. पण कणकवलीत आल्यावर ते वातावरण पुन्हा कोठेतरी पुनर्जीवित होईल असे वाटत रहाते. या मागे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानची प्रायोगिक नाटकाची चळवळ आहे. नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा भाग होता. तो तसाच राहण्यासाठी प्रतिष्ठान सारख्या चळवळीचीच आज गरज आहे. असेही ते म्हणाले.नसिरुद्दीन शहा म्हणाले, आचरेकर प्रतिष्ठान सारखी संस्था गेली 25 वर्षे प्रायोगिक नाट्य चळवळ चालवते या मागे मोठे परिश्रम आहेत. माझे कणकवलीशी खूप जुने नाते आहे. नाट्य चळवळीचा अंत होत आहे असे, अनेक वेळा अनेक ठिकाणी म्हटले जाते. मात्र, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान जोपर्यन्त कार्यरत आहे.तोपर्यन्त नाट्य चवळीचा अंत होणे शक्य नाही. डॉ. अर्जुनदेव चारण म्हणाले, आजच्या असंवेदनशील काळात मनोरंजन करणे दिवसेंदिवस फार कठीण होत आहे. अशा काळातच प्रतिष्ठान सारख्या नाट्य चळवळीची गरज आहे. समाजातील भेदाभेद नष्ट करण्याचे काम अशा गुणात्मक चळवळीतून होत असते. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याचीही तितकीच गरज आहे.(प्रतिनिधी)