शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

आचरेकर प्रतिष्ठानमुळे प्रायोगिक नाट्य चळवळीला गतवैभव - अमोल पालेकर

By admin | Updated: February 14, 2017 19:49 IST

नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक भाग होता. पूर्वीचे नाटकाचे वातावरण आता राहिलेले नाही. मात्र, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक

सुधीर राणे/ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 14 - नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक भाग होता. पूर्वीचे नाटकाचे वातावरण आता राहिलेले नाही. मात्र, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या प्रायोगिक नाट्योत्सवामुळे ते वातावरण पुन्हा निर्माण होवून मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीला गतवैभव मिळेल. कारण ते वातावरण आजही कणकवलीत आहे. असे मत रंगकर्मी अमोल पालेकर यांनी येथे व्यक्त केले.येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रायोगिक नाटयोत्सवाच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विख्यात हिंदी नाट्य- चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शहा , राज्यस्थानचे कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. अर्जुनदेव चारण , आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित आदी उपस्थित होते.यावेळी अमोल पालेकर म्हणाले, सन 1970-80 या दशकातील नाट्याचे वातावरण भारावून टाकणारे होते. ते वातावरण सध्या नक्कीच नाही. पण कणकवलीत आल्यावर ते वातावरण पुन्हा कोठेतरी पुनर्जीवित होईल असे वाटत रहाते. या मागे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानची प्रायोगिक नाटकाची चळवळ आहे. नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा भाग होता. तो तसाच राहण्यासाठी प्रतिष्ठान सारख्या चळवळीचीच आज गरज आहे. असेही ते म्हणाले.नसिरुद्दीन शहा म्हणाले, आचरेकर प्रतिष्ठान सारखी संस्था गेली 25 वर्षे प्रायोगिक नाट्य चळवळ चालवते या मागे मोठे परिश्रम आहेत. माझे कणकवलीशी खूप जुने नाते आहे. नाट्य चळवळीचा अंत होत आहे असे, अनेक वेळा अनेक ठिकाणी म्हटले जाते. मात्र, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान जोपर्यन्त कार्यरत आहे.तोपर्यन्त नाट्य चवळीचा अंत होणे शक्य नाही. डॉ. अर्जुनदेव चारण म्हणाले, आजच्या असंवेदनशील काळात मनोरंजन करणे दिवसेंदिवस फार कठीण होत आहे. अशा काळातच प्रतिष्ठान सारख्या नाट्य चळवळीची गरज आहे. समाजातील भेदाभेद नष्ट करण्याचे काम अशा गुणात्मक चळवळीतून होत असते. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याचीही तितकीच गरज आहे.(प्रतिनिधी)