शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आचरेकर प्रतिष्ठानमुळे प्रायोगिक नाट्य चळवळीला गतवैभव - अमोल पालेकर

By admin | Updated: February 14, 2017 19:49 IST

नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक भाग होता. पूर्वीचे नाटकाचे वातावरण आता राहिलेले नाही. मात्र, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक

सुधीर राणे/ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 14 - नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक भाग होता. पूर्वीचे नाटकाचे वातावरण आता राहिलेले नाही. मात्र, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या प्रायोगिक नाट्योत्सवामुळे ते वातावरण पुन्हा निर्माण होवून मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीला गतवैभव मिळेल. कारण ते वातावरण आजही कणकवलीत आहे. असे मत रंगकर्मी अमोल पालेकर यांनी येथे व्यक्त केले.येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रायोगिक नाटयोत्सवाच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विख्यात हिंदी नाट्य- चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शहा , राज्यस्थानचे कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. अर्जुनदेव चारण , आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित आदी उपस्थित होते.यावेळी अमोल पालेकर म्हणाले, सन 1970-80 या दशकातील नाट्याचे वातावरण भारावून टाकणारे होते. ते वातावरण सध्या नक्कीच नाही. पण कणकवलीत आल्यावर ते वातावरण पुन्हा कोठेतरी पुनर्जीवित होईल असे वाटत रहाते. या मागे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानची प्रायोगिक नाटकाची चळवळ आहे. नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा भाग होता. तो तसाच राहण्यासाठी प्रतिष्ठान सारख्या चळवळीचीच आज गरज आहे. असेही ते म्हणाले.नसिरुद्दीन शहा म्हणाले, आचरेकर प्रतिष्ठान सारखी संस्था गेली 25 वर्षे प्रायोगिक नाट्य चळवळ चालवते या मागे मोठे परिश्रम आहेत. माझे कणकवलीशी खूप जुने नाते आहे. नाट्य चळवळीचा अंत होत आहे असे, अनेक वेळा अनेक ठिकाणी म्हटले जाते. मात्र, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान जोपर्यन्त कार्यरत आहे.तोपर्यन्त नाट्य चवळीचा अंत होणे शक्य नाही. डॉ. अर्जुनदेव चारण म्हणाले, आजच्या असंवेदनशील काळात मनोरंजन करणे दिवसेंदिवस फार कठीण होत आहे. अशा काळातच प्रतिष्ठान सारख्या नाट्य चळवळीची गरज आहे. समाजातील भेदाभेद नष्ट करण्याचे काम अशा गुणात्मक चळवळीतून होत असते. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याचीही तितकीच गरज आहे.(प्रतिनिधी)