शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

केला जीवनाचा अभंग... आधाराचा मृदुंग..!

By admin | Updated: July 3, 2016 02:19 IST

काहींच्या घराची वाताहत झालेली... काहींना आई-वडिलांनी दूर केलेले... नापिकीमुळे काहींची शिक्षणवाट थांबलेली... काहींच्या वाट्याला आलेलं अनाथपण...दोन वेळच्या जेवणाची भ्रांत...

- जिजाबराव वाघ, चाळीसगाव

काहींच्या घराची वाताहत झालेली... काहींना आई-वडिलांनी दूर केलेले... नापिकीमुळे काहींची शिक्षणवाट थांबलेली... काहींच्या वाट्याला आलेलं अनाथपण...दोन वेळच्या जेवणाची भ्रांत...तीन ते अकरा वर्षे वयोगटातील अशा २० मुलांचे हे भरकटलेले आयुष्य वारकरी संप्रदायाच्या वाटेवर आणून एका दाम्पत्याने त्यांच्यासाठी मायेची पंढरी उभारली आहे. कृष्णा महाराज, त्यांच्या पत्नी सुनीता आणि मुलगा राम. हे त्रिकोनी कुटुंब येथील शिवाजी चौकात राहते. कृष्णा महाराज यांच्या घरात वारकरी पंथाची परंपरा. त्यांचे वडील मोतीराम महाराज यांनी शतकापूर्वी चाळीसगाव पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाची पहिली वीट ठेवली. तीन वर्षांपूर्वी या दाम्पत्याने २० मुलांसाठी पूर्णत: निवासी स्वरूपाची व्यवस्था करून त्यांना अध्यात्म आणि शालेय शिक्षणाच्या सूत्रात बांधले. शहरात दर दिवशी ६० घरी जाऊन ही मुले माधुकरी मागतात. त्यात एक भाकरी किंवा दोन पोळ्या आणि एक वाटी भाजी दिली जाते. ३० घरे सकाळी व ३० घरे सायंकाळी असा दिनक्रम आहे. स्वत: कृष्णा महाराज यांनी माधुकरी मागून आळंदीत शिक्षण पूर्ण केले असल्याने त्याद्वारे परोपकाराची भावना वाढीस लागते, अशी त्यांची धारणा आहे. केवळ २० टक्के वारकरी शिक्षण देऊन मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातही आणले आहे. काकडा आरती, वारकरी पाठ , अभंग, कीर्तनाचा अध्याय याबरोबरच त्यांना तबला, मृदुंग, पेटी व गायनही शिकवले जाते. वारकरी संप्रदायाचे आचरण असणाऱ्या कुटुंबीयांकडून मुले माधुकरी घेतात. पुढे मुले वाढली तर जागेचा प्रश्न निर्माण होईल. जागा उपलब्ध झाल्यास अधिक मुलांना मोफत वारकरी शिक्षण देण्याचा मानस आहे. - कृष्णा महाराज, चाळीसगाव