शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

रिक्षातून उडी मारून अपहरणाचा डाव उधळला

By admin | Updated: October 7, 2016 05:07 IST

विरार खानिवडेजवळ शाळेतील दोन विद्यार्थ्यांना रिक्षातून पळवून नेण्यात येत असता त्यांनी प्रसंगावधान राखून रिक्षातून उड्या मारुन पळ काढल्याने अपहरणाचा डाव उधळला गेला.

पारोळ : विरार खानिवडेजवळ शाळेतील दोन विद्यार्थ्यांना रिक्षातून पळवून नेण्यात येत असता त्यांनी प्रसंगावधान राखून रिक्षातून उड्या मारुन पळ काढल्याने अपहरणाचा डाव उधळला गेला. वसई तालुक्यातील खानिवडे प्रतिभा विद्यामंदिराचे भालिवली येथे राहणारे विद्यार्थी आदित्य किसन घाटाळ इयत्ता ७ वी व विकी सुरेश भोये ६ वी हे दोन विद्यार्थी नेहमी प्रमाणे २९ सप्टेंबर रोजी घरातून खानिवडे शाळेत सकाळी ७.३० च्या सुमारास जात होते. सकाळची वेळ असल्याने या रस्त्यावर वर्दळ नव्हती. यावेळी एक अनोळखी रिक्षा त्यांच्या शेजारी येऊन थांबली व त्यात बसलेल्या चालकाने बसा मी तुम्हाला शाळेत सोडतो असे सांगितले. हे दोघेही विद्यार्थी रिक्षात बसले. ती काही अंतरावर पुढे गेल्यानंतर चालकाने दुसऱ्या कुणाशी मोबाईलवर संपर्क साधून हिंदीमध्ये संभाषण करतांना सांगितले कि, दो को हम ले आए है, आप तैयार रहना. हे हिंदी संभाषण आदित्यने ऐकले व आपल्याला काहीतरी धोका असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा त्याने विकीला खुणेने रिक्षातून उडी मारण्यास सांगितले. रिक्षा सर्व्हिस रोडवरून मुख्य महामार्गावर जात असतांना वेग कमी असल्याने दोघांनीही बाहेर उड्या मारल्या. रिक्षाचालकास हे समजताच त्याने रिक्षा थांबवण्याऐवजी महामार्गावर मुंबई दिशेने निघून गेला . या दरम्यान आदित्यने न घाबरता रिक्षाच्या पाठीमागे नंबर शोधण्यासाठी नजर लावली परंतु रिक्षाला नंबरच नसल्याचे त्याच्या लक्षात आल्याचे त्याने या प्रसंगाविषयी बोलताना सांगितले . दरम्यान, तसेच उडी मारताना विकीला मार लागला आहे . दरम्यान भालिवली येथील इतर सवंगडी आल्यावर त्यांच्या बरोबर शाळेत येऊन घडलेला प्रसंग आदित्यने क्लास टीचरला सांगितला. यामुळे पोलिसांनी या रस्त्यावरील गस्त वाढविली आहे. (वार्ताहर)