शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा विचार सोडून मनामध्ये नवी उमेद जागवा

By admin | Updated: September 10, 2016 06:13 IST

वैयक्तिक प्रश्न, नातेसंबंधातील दुरावा, नोकरीतील असुरक्षितता आणि असमाधान अशा अनेक कारणांतून तणाव निर्माण होतो.

पूजा दामले,

मुंबई- नैसर्गिक आपत्ती, समाजाचा दबाव, वैयक्तिक प्रश्न, नातेसंबंधातील दुरावा, नोकरीतील असुरक्षितता आणि असमाधान अशा अनेक कारणांतून तणाव निर्माण होतो. अधिक काळ तणाव राहिल्याने त्यातून नकारात्मक विचार निर्माण होतात. सतत प्रयत्नांतून उत्तर मिळत नसल्यामुळे स्वत:ला संपविण्याचा मार्ग निवडला जातो. आत्महत्येचा संबंध हा मानसिक आरोग्य आणि समाजाशी आहे. ‘सद्य:स्थिती बदलेल’ ‘यातून सुटू’ असा सकारात्मक विचार करणे आवश्यक असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘आत्महत्या प्रतिबंध दिना’च्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने तज्ज्ञांची मते जाणून घेतली. समस्या येत असतातच पण त्यात अडकून पडणे चुकीचे आहे. समस्यांपुढे आयुष्य आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. समस्येपलीकडे विचार करणे आवश्यक असते. या विचारांमुळे सकारात्मक विचार मनात रुजू लागतात. ‘अंधारात आशेचा किरण नवी उमेद देतो’ हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नये, मानसिक समतोल राखणे महत्त्वाचे आहे. याची सवय माणसाने लावून घेतली पाहिजे, असे मत केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागप्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी व्यक्त केले. ‘मार्केट जॉय... मॅक्सिमम जॉय’मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी म्हणाले, सद्य:स्थितीचा विचार केल्यास आजूबाजूला नकारात्मक गोष्टी प्रकर्षाने दिसतात, जाणवतात. बातम्यांमध्येही बलात्कार, अपहरण, खून अशाच गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळेही नकारात्मकता वाढत चालली आहे. पण, यावर उपाय म्हणजे सकारात्मकता वाढवणे. यासाठी कोणतेही अधिक कष्ट घ्यायची आवश्यकता नाही. दैनंदिन जीवनात छोटाशी सकारात्मक घटना घडली तरी तिला महत्त्व द्या. लहान असली तरी ती सकारात्मक आहे. याला महत्त्व आहे. त्यामुळे ‘मार्केट जॉय... मॅक्सिमम जॉय’ हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. शारीरिक दुखणे असल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करा. >तणावाखालील व्यक्तींची काळजी घ्या !अनेक व्यक्ती तणावाखाली असतात. प्राथमिक पातळीवर तणावाखालील व्यक्ती पटकन लक्षात येत नाहीत. पण, व्यक्तीच्या वागण्यात-बोलण्यात बदल झाल्यास तत्काळ त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जा. १)या व्यक्तींना एकटे राहू देऊ नका२)घरातील तीक्ष्ण वस्तू लपवून ठेवा३)विषारी पदार्थ घरात ठेवू नका४)खोलीचा दरवाजा बंद करू देऊ नका५)त्यांच्याशी बोलताना सकारात्मक गोष्टी बोला६)वेळच्या वेळी औषधे द्याहेल्पलाइनमुळे शेतकऱ्यांना मदतगेल्या वर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांसमोर प्रश्नांना उत्तरे न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्या. पण, अनेक शेतकऱ्यांना समुपदेशन मिळाल्याने त्यांनी पुन्हा नव्याने जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी मानसिक आरोग्यासाठी ‘१०४’ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर ३१ आॅगस्ट २०१६पर्यंत एकूण २० हजार ७२३ कॉल्स आले आहेत. यापैकी २१४ कॉल्स हे आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा आत्महत्येचा विचार मनात आहेत, यासाठी आले असल्याची माहिती हेल्पलाइनच्या केंद्रप्रमुख नीरजा बैंकर यांनी ‘लोकमत’ला दिली. दृष्टिकोन बदलायला हवा!आत्महत्या करणे, आत्महत्येचा विचार मनात येणे हा साधा सरळ विषय नाही. पण, गेल्या काही वर्षांपर्यंत आत्महत्या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जायचे नाही. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीला घाबरट, पळपुटा असे म्हटले जायचे. आता या विचारात बदल होताना दिसत आहे. आत्महत्येचा संबंध हा मानसिक आरोग्याशी, समाजाशी आहे. मेंदूतील रासायनिक बदलांचा परिणाम आहे. हा मानसिक आजार असल्यामुळे त्यावर औषधोपचार आवश्यक आहेत. त्यामुळे मानसिकता, दृष्टिकोन बदलायला हवा. जेव्हा एक माणूस आत्महत्येचा प्रयत्न करतो त्याआधी ९ जणांनी हा प्रयत्न केलेला असतो. ‘९ पॅरा सुसाईड’ असे संबोधतात. याला आळा घालण्यासाठी दृष्टिकोनात बदल व्हायला हवा.- डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ >2015 या वर्षात १५३ तर जानेवारी ते आॅगस्ट २०१६ दरम्यान ६१ आत्महत्येसंदर्भात कॉल्स हेल्पलाइनवर आले आहेत. २०१५मध्ये आलेले बहुतांश कॉल्स हे आशा वर्कर्सनी शेतकऱ्यांसाठी केले होते. दुष्काळाच्या भीषण परिस्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना पुढे जाण्याचा मार्ग सुचत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 104 या क्रमांकावर या शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना पर्यायी मार्ग सुचवले गेले होते. त्याचबरोबर परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे कॉल्स आणि अत्यल्प प्रमाणात मनाविरुद्ध लग्न झाल्यामधून तणावाखाली असणाऱ्या महिलांचे आले होते. तर, घटस्फोटाच्या प्रक्रियेत असणाऱ्यांचेही कॉल्स येत असल्याची माहिती नीरजा यांनी दिली.