शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

आमिर खानचे पत्नीसह लातूरमध्ये पाण्यासाठी श्रमदान !

By admin | Updated: April 25, 2017 14:43 IST

लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी आणि तगरखेडा या दोन गावात पाणी चळवळीच्या कामासाठी श्रमदानाला पोहोचला आमिर खान.

 ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 25  - अभिनेता आमिर खान... तो आला... त्याने पाहिलं... हाती फावडं घेतलं... सोबत टोपलं घेतलं... आणि जमिनीत फावडा मारुन माती उकरली... स्वत:च्या हाताने टोपलीत भरली... उचलली आणि दूर नेऊन टाकली सुद्धा... लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (गौर) आणि तगरखेडा या दोन गावात पाणी चळवळीच्या कामासाठी श्रमदानाला आमिर खान आल्यावर घडलेली ही गोष्ट. मांजरा नदीच्या पट्ट्यातील ओसाड माळरानावर आमिर खानने पत्नी किरणसह केलेल्या श्रमदानाची चर्चा आता लातूर जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. 
 
हे चित्रपटाचे शुटींग नसून पाण्याच्या संघर्षाची खरीखुरी कहाणी आहे. रुपेरी पडद्यावर आपल्या सकस अभियनाने सर्वांच्या मनावर मोहिनी घातलेल्या आमिर खानने मंगळवारी चक्क लातूर जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नदीच्या पट्ट्यात फावडा आणि टिकाव चालवला. एका गावात २० मिनिटे तर दुस-या गावात चार तास खर्च केलेल्या या अभिनेत्याने नुस्ते श्रमदानच केले नाही तर पाण्याची समस्या गावक-यांना कशी आहे ? याची माहिती घेतली. उपाय काय केला पाहिजे ? याचा कानोसा घेतला. 
 
निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) आणि तगरखेडा ही ती दोन गावे. आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत ही दोन गावे सहभागी झाली आहेत. या दोन्ही गावचे गावकरी मोठ्या प्रमाणात श्रमदान करुन पाणी मोहिम राबवित आहेत. त्यांच्या या चळवळीला आज आमिर खानने स्वत: उपस्थित राहून आपल्या पाणी फाऊंडेशनचे बळ दिले. एवढा मोठा अभिनेता आपल्या गावात आपल्या पाण्यासाठी खोरे - टोपले घेऊन काम करतोय, याने गावक-यांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही.
 
आमीर येण्याची बातमी ठेवली गुप्त !
सुरक्षेच्या कारणावरुन पोलिसांनी व्हीव्हीआयएमपी माणूस येणार एवढेच कळविले होते. त्यामुळे ‘आमीर येणार’ ही बातमी गुप्त राहिली. मात्र तरीही पोलिसांचा भलामोठा फौजफाटा पाहिल्यावर कुणीतरी मोठा माणूस येणार म्हणून गर्दी जमली ती जमलीच.
 
तगरखेड्यात अर्धात तास बांध खंदून आमिरने केले पाणी श्रमदान !
तगरखेडा शिवारातील प्रत्येकाच्या शेतात संध्या बांध बखिस्तीचे काम चालू आहे. आमीर खानने डॉ. शरद मठपती यांच्या शेतात बांध बंधिस्ती करुन श्रमदान केले.
 
आनंदवाडीत एका घरात घेतली गावक-यांची बैठक
आनंदवाडी गौर या गावात आमिर खानने गावातील पाणी चळवळीतील १५ पुरुष आणि १५ महिलांची एका घरात बैठक घेतली. त्यांच्याकडून पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना आपल्याकडी सूचना केल्या. तुम्ही श्रमदान करा, तुमच्या गावाला आमिर खान पाण्यासाठी लागेल तेवढे पैसे देईल, अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केले.