शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

आमिर ‘जलयुक्त’चा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर!

By admin | Updated: February 17, 2016 03:29 IST

असहिष्णुतेच्या वक्तव्यावरून संघ परिवाराच्या टिकेचे लक्ष्य बनलेला बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर होणार आहे.

यदु जोशी,  मुंबईअसहिष्णुतेच्या वक्तव्यावरून संघ परिवाराच्या टिकेचे लक्ष्य बनलेला बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर होणार आहे. मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला झाल्यानंतर त्याच रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि गणमान्य व्यक्तींच्या सन्मानार्थ स्रेहभोजन दिले होते. त्यावेळी आमिर खानने पंतप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई करून आमिरविषयीची कटूता संपविली. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांबरोबरच्या चर्चेवेळी मुख्यमंत्र्यांनी आमिर खान यांना राज्यासाठी काही योगदान देण्याची विनंती केली होती. ती लगेच मान्य करत आमिरने जलयुक्त शिवारचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर होण्यास होकार दिला.जलयुक्त शिवार योजनेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून आमिर आता कामे सुरू असलेल्या ठिकाणी भेटी देणार आहेत. तेथील शेतकऱ्यांशी ते चर्चा करतील आणि या योजनेचा प्रचारही करतील. या शिवाय ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविली गेली अशा ठिकाणच्या यशोगाथा टीव्ही चॅनेल्सवर आणतील. महानायक अमिताभ बच्चन हे राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहेतच. ‘मेक इन महाराष्ट्र’साठी उद्योग विभागाने तयार केलेल्या चित्रफितीमध्ये अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी योगदान दिले आहे.देशात सध्या अहिष्णुतेचे वातावरण असून मुलांच्या काळजीपोटी आपण देश सोडून परदेशी जाऊ का अशी विचारणा पत्नीने केली होती, असे वक्तव्य आमिरने केले होते. त्यावरून देशभर बराच गदारोळ माजला होता. विशेषत: भाजप समर्थकांनी आमिरला टिकेचे लक्ष्य बनविले होते.