शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

सोयाबीनचे ९५ टक्के बियाणे फेल!

By admin | Updated: June 5, 2014 00:58 IST

सध्या विदर्भातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अगोदरच सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांपुढे आता बोगस बियाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बोगस बियाण्यांचा धोका : शेतकरी दुहेरी संकटात जीवन रामावत-नागपूर सध्या विदर्भातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अगोदरच सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांपुढे आता  बोगस बियाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मान्सूनची चाहूल लागताच बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पण सोयाबीनच्या बोगस  बियाण्याने सर्वांची चिंता वाढविली आहे. बीज परीक्षण प्रयोगशाळेच्या एका अहवालानुसार यंदा सोयाबीन बियाण्याच्या २९६ नमुन्यांपैकी केवळ १५  (५ टक्के) नमुने पात्र ठरले असून, इतर २८१ (९५ टक्के) नमुने  फेल ठरले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात कृषी विभागाचे  बियाणे गुणवत्ता नियंत्रक निरीक्षकांकडून आलेल्या ८३ नमुन्यांसह शेतकर्‍यांकडील १९९ व बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या १४ नमुन्यांचा समावेश आहे. बीज परीक्षण प्रयोगशाळेत या सर्व नमुन्यांचे परीक्षण केले असता, त्यापैकी कृषी विभागाकडून आलेल्या ८३ पैकी ७४ नमुने बाद ठरले आहे तसेच  शेतकर्‍यांचे १९९ पैकी १९३ व बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे १४ पैकी १४ नमुने अपात्र ठरले आहेत.  विशेष म्हणजे, यापूर्वी कधीही एवढय़ा मोठय़ा  प्रमाणात सोयाबीन बियाण्यांचे नमुने अपात्र ठरलेले नाहीत. यामुळे यंदा स्वत:  प्रयोगशाळेने बाजारात मोठय़ा प्रमाणात बोगस बियाणने दाखल होण्याची  भीती व्यक्त करून, शेतकर्‍यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. गतवर्षी विदर्भात झालेल्या अतवृष्टीमुळे  सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले  होते. यात अनेकांच्या सोयाबीनला अंकुर फुटले होते. शिवाय काहींचे सोयाबीन काळे पडले होते. यानंतर व्यापार्‍यांनी ते सर्व सोयाबीन कमी किमतीत खरेदी करून, आता तेच पुन्हा बियाण्याच्या स्वरूपात शेतकर्‍यांच्या माथी मारल्याची भीती व्यक्त  केली जात आहे.  महाराज बाग चौकातील बीज परीक्षण प्रयोगशाळा ही बियाण्यांचे नमुने तपासणारी विदर्भातील एकमेव प्रयोगशाळा आहे.  त्यामुळे या  प्रयोगशाळेच्या अहवालाने सर्वांची चिंता वाढविली आहे.