शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

राज्याला मिळाले ९.३0 कोटी!

By admin | Updated: February 16, 2016 01:04 IST

रब्बी पीक विमा रकमेत अमरावती विभागाचा वाटा ३.९९ टक्के तर विभागात अकोला जिल्हा आघाडीवर.

राजरत्न सिरसाट/अकोला: राष्ट्रीय पीक विमा योजना शेतकर्‍यांसाठी कवचकुंडलाची भूमिका बजावत असून, मागील १६ वर्षांत रब्बी पीक विम्याची ९३0 कोटी ७३ लाख १८ हजार रुपये नुकसान भरपाई राज्यातील शेतकर्‍यांना मिळाली असून,अमरावती विभागाचा यात ३.९९ टक्के वाटा आहे. या विभागात अकोला जिल्हा आघाडीवर आहे. पावसाची अनिश्‍चितता,नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सन १९९९ मध्ये सर्वप्रथम रब्बी पिकासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यानंतर २000 साली खरीप पीक विमा योजना सुरू करण्यात आली. या पीक विमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांना पिकाचा विमा काढावा लागतो. मागील १६ वर्षात राज्यात २४ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचा विमा काढण्यात आला होता. याकरिता २१४ कोटी ५५ लाख ६७ हजार विमा हप्ता शेतकर्‍यांनी भरला होता. या विमा हप्त्यापोटी राज्यातील २९ लाख ८८ हजार शेतकर्‍यांना ९३0 कोटी ७३ लाख १८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. या रब्बी विमा योजनेचा लाभ विदर्भातील १८ लाख ५८ हजार शेतकर्‍यांना झाला आहे. ११ लाख ६३ हजार हेक्टरचा विमा शेतकर्‍यांनी काढला होता.अमरावती विभागातील शेतकर्‍यांनी १२ कोटी ६८ लाख ८२ हजार रुपये विमा हप्ता भरला होता. या विभागाला ३७ कोटी ११ लाख ३0 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.अकोला जिल्हा आघाडीवरनैसर्गिक आपत्ती बघता अकोला जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेवर भर दिला असून,रब्बी पीक विमा योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत या जिल्हय़ातील एक लाख ३७ हजार शेतकर्‍यांनी ९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये रब्बी पीक विमा हप्ता भरला होता, या शेतकर्‍यांना १९९९ ते २0१५ पर्यंत २५ कोटी ५४ लाख ५५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. ही टक्केवारी २.७५ म्हणजे अमरावती विभागातील पाच जिल्हय़ात सर्वाधिक आहे.