शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

राज्याला मिळाले ९.३0 कोटी!

By admin | Updated: February 16, 2016 01:04 IST

रब्बी पीक विमा रकमेत अमरावती विभागाचा वाटा ३.९९ टक्के तर विभागात अकोला जिल्हा आघाडीवर.

राजरत्न सिरसाट/अकोला: राष्ट्रीय पीक विमा योजना शेतकर्‍यांसाठी कवचकुंडलाची भूमिका बजावत असून, मागील १६ वर्षांत रब्बी पीक विम्याची ९३0 कोटी ७३ लाख १८ हजार रुपये नुकसान भरपाई राज्यातील शेतकर्‍यांना मिळाली असून,अमरावती विभागाचा यात ३.९९ टक्के वाटा आहे. या विभागात अकोला जिल्हा आघाडीवर आहे. पावसाची अनिश्‍चितता,नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सन १९९९ मध्ये सर्वप्रथम रब्बी पिकासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यानंतर २000 साली खरीप पीक विमा योजना सुरू करण्यात आली. या पीक विमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांना पिकाचा विमा काढावा लागतो. मागील १६ वर्षात राज्यात २४ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचा विमा काढण्यात आला होता. याकरिता २१४ कोटी ५५ लाख ६७ हजार विमा हप्ता शेतकर्‍यांनी भरला होता. या विमा हप्त्यापोटी राज्यातील २९ लाख ८८ हजार शेतकर्‍यांना ९३0 कोटी ७३ लाख १८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. या रब्बी विमा योजनेचा लाभ विदर्भातील १८ लाख ५८ हजार शेतकर्‍यांना झाला आहे. ११ लाख ६३ हजार हेक्टरचा विमा शेतकर्‍यांनी काढला होता.अमरावती विभागातील शेतकर्‍यांनी १२ कोटी ६८ लाख ८२ हजार रुपये विमा हप्ता भरला होता. या विभागाला ३७ कोटी ११ लाख ३0 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.अकोला जिल्हा आघाडीवरनैसर्गिक आपत्ती बघता अकोला जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेवर भर दिला असून,रब्बी पीक विमा योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत या जिल्हय़ातील एक लाख ३७ हजार शेतकर्‍यांनी ९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये रब्बी पीक विमा हप्ता भरला होता, या शेतकर्‍यांना १९९९ ते २0१५ पर्यंत २५ कोटी ५४ लाख ५५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. ही टक्केवारी २.७५ म्हणजे अमरावती विभागातील पाच जिल्हय़ात सर्वाधिक आहे.