शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
3
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
4
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
5
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
6
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
7
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
8
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
9
एमएमसी झोनच्या ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ८९ लाखांचं होतं बक्षीस; दरेकसा दलम झाला खिळखिळा
10
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
13
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
14
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
15
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
16
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
17
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
18
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
19
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
20
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीसाठी 9,199 उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2017 17:20 IST

राज्यातील 10 महापालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 199 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत;

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - राज्यातील 10 महापालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 199 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; तसेच पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 278 उमेदवार; तर 165 पंचायत समित्यांच्या एकूण 1 हजार 712 जागांसाठी 7 हजार 693 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यातील 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारी 2017 रोजी 15 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 165 पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचा दोन्ही टप्प्यांत समावेश असून, पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील 8; तर दुसऱ्या टप्प्यात 4 पंचायत समित्या आणि त्यातील निवडणूक विभागांचा समावेश आहे. मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी होईल.दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदांच्या 654 जागासांठी छाननीनंतर 6 हजार 367 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. 118 पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 10 हजार 879 नामनिर्देनशपत्रे वैध ठरली आहेत. काही उमेदवार एकापेक्षा जास्त नामनिर्देशनपत्रे दाखल करतात; परंतु एखाद्याने कितीही नामनिर्देशनपत्रे दाखल केली असली तरी अंतिमत: प्रत्येकाचा एकच उमेदवारी अर्ज गृहीत धरला जातो. त्यामुळे नामनिर्देशनपत्रांच्या माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. ही मुदत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 13 फेब्रुवारी 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत असेल.महापालिकानिहाय (एकूण जागा) उमेदवारांची संख्या: बहन्मुंबई (227)- 2,271, ठाणे (131)- 1,134, उल्हासनगर (78)- 821, नाशिक (122)- 1,089, पुणे (162)- 623, पिंपरी-चिंचवड (128)- 804, सोलापूर (102)- 478, अकोला (80)- 579, अमरावती (87)- 626 आणि नागपूर (151)- 774. एकूण (1,268)- 9,199.पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदनिहाय (एकूण जागा) उमेदवारांची संख्या: अहमदनगर (72)- 303, औरंगाबाद (62)- 323, बीड (60)- 440, बुलडाणा (60)- 333, चंद्रपूर (56)- 314, गडचिरोली (35)- 176, हिंगोली (52)- 245, जळगांव (67)- 244, जालना (56)- 266, लातूर (58)- 231, नांदेड (63)- 374, उस्मानाबाद (55)- 254, परभणी (54)- 276, वर्धा (50)- 293 आणि यवतमाळ (55)- 306. एकूण जागा (855)- 4,278. या जिल्हा परिषदांतर्गतच्या 165 पंचायत समित्या (1712)- 7,693.