शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

आदिवासी शाळेतील ९0 विद्यार्थी बेपत्ता!

By admin | Updated: November 16, 2016 02:38 IST

धक्कादायक परिस्थिती; पालकांनीही सोडले गाव.

गणेश मापारीखामगाव, दि. १५- पाळा येथील आदिवासी प्राथमिक निवासी शाळेमधील तब्बल ९0 विद्यार्थ्यांनी पालकांसह गाव सोडल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. विद्यार्थीनीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळेची मान्यता रद्द करण्यात आल्याने, या शाळेमधील विद्यार्थ्यांचे दुसर्‍या शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला असता, ही बाब उजेडात आली.खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थीनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात १७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आदिवासी आयुक्तांनी सदर शाळेची मान्यता रद्द केल्यामुळे या शाळेतील ३८८ विद्यार्थ्यांंचे समायोजन करण्याची प्रक्रिया आदिवासी विभागाकडून सुरू आहे. पाळा येथील आश्रमशाळेमध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा आणि जळगाव या पाच जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त सर्व विद्यार्थी आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे आदिवासी विभागाची विविध पथके विद्यार्थ्यांंच्या मूळ गावात जावून त्यांच्या पालकांकडून समायोजन करण्याच्या शाळेबाबत लेखी संमती घेत आहेत; मात्र एकूण ३८८ विद्यार्थ्यांंपैकी ९0 विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी पथकाला आढळून आले नाहीत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांंचे पालकसुद्धा गाव सोडून गेले आहेत. विद्यार्थी आणि पालक मध्य प्रदेशात!आदिवासी विभागाच्या पथकाला काही विद्यार्थी व त्यांचे पालक मध्य प्रदेशात गेल्याची माहिती मिळाली आहे. शाळेतील नोंदणीनुसार विद्यार्थ्यांंच्या गावाचा शोध घेण्यात आला आहे. संबधीत गावातील सरपंचांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी गाव सोडल्याबाबत या पथकाला लेखी माहिती देखील दिली आहे. बनावट प्रवेश की आरोपींची भीती?आदिवासी आश्रमशाळेतील ९0 विद्यार्थी पालकांसह मूळ गावातून गायब होण्याबाबत दोन शक्यता वर्तविण्यात येत आहेत. या प्रकरणातील आरोपींच्या भीतीपोटी पालकांनी गाव सोडले, अशी चर्चा काही गावांमध्ये आहे, तर आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांंकडून प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन विद्यार्थ्यांंचा शाळेमध्ये बनावट प्रवेश दाखविला असेल, प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेत येतच नसतील, ही वस्तुस्थितीही समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाळा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांंचे वेगवेगळ्या शाळांमध्ये समायोजन करण्याकरीता सदर विद्यार्थ्यांंच्या मूळगावी पथक पाठविण्यात आले. अनेक गावांमध्ये विद्यार्थी आणि पालक आढळून आले नाहीत. त्यामुळे सरपंचांकडून लेखी माहिती घेण्यात आली आहे. -व्ही.ए.सोनवणे, आदिवासी प्रकल्प अधिकारी, अकोला.