शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

९० टक्के बंधारे कोरडेच

By admin | Updated: September 21, 2016 01:50 IST

शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये लाखो रुपये खर्च करून झालेल्या ‘जलयुक्त शिवारा’च्या कामांमधील जवळपास ९० टक्के बंधारे, के. टी. बंधारे अद्यापही कोरडे

शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये लाखो रुपये खर्च करून झालेल्या ‘जलयुक्त शिवारा’च्या कामांमधील जवळपास ९० टक्के बंधारे, के. टी. बंधारे अद्यापही कोरडे असून, ऐन पावसाळ्यात या भागातील ओढे-नाले कोरडे पडले आहेत.शिक्रापुरातील काही भाग, पाबळ, धामारी, खैरेनगर, खैरेवाडी, मिडगुलवाडी व परिसरातील वाड्यावस्त्यांवर अद्यापही विहिरींच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे. धामारी परिसरात सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून जलयुक्त शिवाराचे काम करण्यात आले. अनेक ओढे, नाले यांचे खोलीकरण करण्यात आले, तर काही भागात के. टी. बंधाऱ्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत झालेल्या सुमार पावसाने अद्यापही हे सर्व बंधारे कोरडे असून, येत्या महिनाभरात पावसाने हजेरी लावली तरच ‘जलयुक्त शिवार’ या योजनेचा फायदा या भागाला होणार आहे. या भागात झालेल्या जलयुक्त शिवारातील कामांचा अजून तरी काहीही फायदा झाला नाही. शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील काही गावांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी अद्यापही धावपळ करावी लागत असून, मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या या भागातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संपूर्णपणे हातून गेला आहे. (वार्ताहर)>पाणी नाहीपाबळला काही भागांत थिटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्याचा फायदा झाला असला तरी पिंपळवाडी, फुटाणवाडी, थापेवाडी आदी भागांत शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे.ओढे, नाले कोरडे पडले आहेत. खैरेनगर, मिडगुलवाडी, आंदळवाडी आदी भागांतही पुरेल एवढेच पाण्याचे साठे विहिरीत असल्याचे येथील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.