शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के कर्मचाऱ्यांचा ‘भविष्य निर्वाह’ही खडतर !

By admin | Updated: September 27, 2016 21:44 IST

जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत ना ग्रामपंचायत ना जिल्हा परिषद प्रशासन गंभीर आहे.

ऑनलाइन लोकमत

उस्मानाबाद, दि. 27 - जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत ना ग्रामपंचायत ना जिल्हा परिषद प्रशासन गंभीर आहे. शासनाने आदेश देवूनही अद्याप ९० टक्के कर्मचाऱ्यांचे संयुक्त बँक खातेच उघडण्यात आलेले नाही. संबंधित कर्मचारी संघटना तसेच काही जि.प. सदस्यांकडूनही पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, आजपावेतो कर्मचाऱ्यांच्या हाती आश्वासनाशिवाय काहीच पडले नाही. हे थोडके म्हणून की काय, मागील सहा महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतनही मिळालेले नाही. या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्हाभरात सुमारे ६२१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीअंतर्गत लिपीक, पाणीपुरवठा, सफाई कर्मचारी आणि शिपाई असे एकूण १ हजार १९३ कर्मचारी कार्यरत आहेत. सदरील कर्मचाऱ्यांना विविध सोयीसुविधा देण्याबाबत शासनाचे निर्देश असले तरी प्रत्यक्षात त्या दिल्या जात नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भविष्य निर्वाह निधी (पीएफ). भविष्य निर्वाह निधी म्हणून दरमहा या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ८.३३ टक्के आणि ग्रामपंचायतीचे ८.३३ टक्के असे एकूण १६.६६ टक्के रक्कम कपातून करून घेतली जाते. ही रक्कम संबंधित ग्रापंचायतीचे ग्रामसेवक आणि कर्मचारी यांचे संयुक्त बँक खाते उघडून त्यात टाकावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.परंतु हे निर्देश केवळ कागदापुरतेच मर्यादित असल्याचे समोर आले आहे. कारण तब्बल ९० टक्के कर्मचाऱ्यांचे अद्याप संयुक्त बँक खातेच उघडण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने यासाठी मागील अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून फारशी दखल घेतली जात नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीची झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही करू, असे आश्वासही सभागृहात दिले होते. परंतु, अद्याप त्यानुषंगाने ठोस कार्यवाही सुरू झालेली नाही, असेही कर्मचारी सांगतात. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांचा ‘भविष्य निर्वाह’ही अधांतरीच असल्याचे दिसून येते.