शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

९० टक्के कर्मचाऱ्यांचा ‘भविष्य निर्वाह’ही खडतर !

By admin | Updated: September 27, 2016 21:44 IST

जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत ना ग्रामपंचायत ना जिल्हा परिषद प्रशासन गंभीर आहे.

ऑनलाइन लोकमत

उस्मानाबाद, दि. 27 - जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत ना ग्रामपंचायत ना जिल्हा परिषद प्रशासन गंभीर आहे. शासनाने आदेश देवूनही अद्याप ९० टक्के कर्मचाऱ्यांचे संयुक्त बँक खातेच उघडण्यात आलेले नाही. संबंधित कर्मचारी संघटना तसेच काही जि.प. सदस्यांकडूनही पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, आजपावेतो कर्मचाऱ्यांच्या हाती आश्वासनाशिवाय काहीच पडले नाही. हे थोडके म्हणून की काय, मागील सहा महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतनही मिळालेले नाही. या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्हाभरात सुमारे ६२१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीअंतर्गत लिपीक, पाणीपुरवठा, सफाई कर्मचारी आणि शिपाई असे एकूण १ हजार १९३ कर्मचारी कार्यरत आहेत. सदरील कर्मचाऱ्यांना विविध सोयीसुविधा देण्याबाबत शासनाचे निर्देश असले तरी प्रत्यक्षात त्या दिल्या जात नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भविष्य निर्वाह निधी (पीएफ). भविष्य निर्वाह निधी म्हणून दरमहा या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ८.३३ टक्के आणि ग्रामपंचायतीचे ८.३३ टक्के असे एकूण १६.६६ टक्के रक्कम कपातून करून घेतली जाते. ही रक्कम संबंधित ग्रापंचायतीचे ग्रामसेवक आणि कर्मचारी यांचे संयुक्त बँक खाते उघडून त्यात टाकावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.परंतु हे निर्देश केवळ कागदापुरतेच मर्यादित असल्याचे समोर आले आहे. कारण तब्बल ९० टक्के कर्मचाऱ्यांचे अद्याप संयुक्त बँक खातेच उघडण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने यासाठी मागील अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून फारशी दखल घेतली जात नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीची झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही करू, असे आश्वासही सभागृहात दिले होते. परंतु, अद्याप त्यानुषंगाने ठोस कार्यवाही सुरू झालेली नाही, असेही कर्मचारी सांगतात. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांचा ‘भविष्य निर्वाह’ही अधांतरीच असल्याचे दिसून येते.