शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

९० टक्के कर्मचाऱ्यांचा ‘भविष्य निर्वाह’ही खडतर !

By admin | Updated: September 27, 2016 21:44 IST

जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत ना ग्रामपंचायत ना जिल्हा परिषद प्रशासन गंभीर आहे.

ऑनलाइन लोकमत

उस्मानाबाद, दि. 27 - जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत ना ग्रामपंचायत ना जिल्हा परिषद प्रशासन गंभीर आहे. शासनाने आदेश देवूनही अद्याप ९० टक्के कर्मचाऱ्यांचे संयुक्त बँक खातेच उघडण्यात आलेले नाही. संबंधित कर्मचारी संघटना तसेच काही जि.प. सदस्यांकडूनही पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, आजपावेतो कर्मचाऱ्यांच्या हाती आश्वासनाशिवाय काहीच पडले नाही. हे थोडके म्हणून की काय, मागील सहा महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतनही मिळालेले नाही. या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्हाभरात सुमारे ६२१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीअंतर्गत लिपीक, पाणीपुरवठा, सफाई कर्मचारी आणि शिपाई असे एकूण १ हजार १९३ कर्मचारी कार्यरत आहेत. सदरील कर्मचाऱ्यांना विविध सोयीसुविधा देण्याबाबत शासनाचे निर्देश असले तरी प्रत्यक्षात त्या दिल्या जात नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भविष्य निर्वाह निधी (पीएफ). भविष्य निर्वाह निधी म्हणून दरमहा या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ८.३३ टक्के आणि ग्रामपंचायतीचे ८.३३ टक्के असे एकूण १६.६६ टक्के रक्कम कपातून करून घेतली जाते. ही रक्कम संबंधित ग्रापंचायतीचे ग्रामसेवक आणि कर्मचारी यांचे संयुक्त बँक खाते उघडून त्यात टाकावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.परंतु हे निर्देश केवळ कागदापुरतेच मर्यादित असल्याचे समोर आले आहे. कारण तब्बल ९० टक्के कर्मचाऱ्यांचे अद्याप संयुक्त बँक खातेच उघडण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने यासाठी मागील अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून फारशी दखल घेतली जात नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीची झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही करू, असे आश्वासही सभागृहात दिले होते. परंतु, अद्याप त्यानुषंगाने ठोस कार्यवाही सुरू झालेली नाही, असेही कर्मचारी सांगतात. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांचा ‘भविष्य निर्वाह’ही अधांतरीच असल्याचे दिसून येते.