शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

९ वॅट एलईडी योजनेची विदर्भातील सुरुवात होणार अकोल्यातून

By admin | Updated: December 25, 2016 17:50 IST

देशभरात सुरू करण्यात आलेल्या एलईडी बल्ब वितरण योजनेंतर्गत सातऐवजी नऊ वॅटचे बल्ब देण्याची योजना राज्यात लागू झाली

ऑनलाइन लोकमत/अतुल जयस्वालअकोला, दि. 25 - केंद्र सरकारच्या उन्नत ज्योती अफॉर्डेबल एलईडी फॉर आॅल (उजाला) या उपक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या एलईडी बल्ब वितरण योजनेंतर्गत सातऐवजी नऊ वॅटचे बल्ब देण्याची योजना राज्यात लागू झाली आहे. नऊ वॅट एलईडी दिवे केवळ ६५ रुपयांत देण्याच्या योजनेला पुण्यात सुरुवात झाली असून, विदर्भातील सुरुवात अकोल्यातून होणार असल्याची माहिती ही योजना राबविणाऱ्या एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. ईईएसएल या कंपनीने महावितरणच्या सहाय्याने महाराष्ट्रात जुलै २०१५ मध्ये एलईडी दिवे वितरित करण्याची योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत सात वॅटचे १० बल्ब प्रत्येकी केवळ ८५ रुपयांना वितरित करण्यात आले. महावितरण आणि ईईएसएल यांच्या वतीने प्रमुख शहरांमध्ये वितरण केंद्रे उभारण्यात आली होती. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळून लाखो एलईडी दिव्यांची विक्री झाली. दरम्यानच्या काळात इतर राज्यांमध्ये या योजनेंतर्गत नऊ वॅटचे एलईडी दिवे वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातही या योजनेंतर्गत नऊ वॅटचे एलईडी दिवे आणण्याचा प्रस्ताव ईईएसल कंपनीने राज्य सरकारपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा किंवा १ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात ९ वॅटचे एलईडी दिवे वितरित करण्यात येणार होते; परंतु हिवाळी अधिवेशनामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली. दरम्यान, अधिवेशन आटोपल्यानंतर राज्यात पुणे येथून या योजनेची सुरुवात झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीचे सर्व मार्ग मोकळे झाल्यामुळे लवकरच राज्यातील सर्वच शहरांमध्ये ही योजना सुरू होणार असून, विदर्भात योजनेची सुरुवात अकोला शहरातून होणार आहे. केवळ ६५ रुपयांत ९ वॅट एलईडी दिवाया योजनेअंतर्गत ९ वॅटचा एलईडी दिवा केवळ ६५ रुपयांमध्ये मिळणार आहे. पूर्वीच्या सात वॅट एलईडी योजनेप्रमाणेच या योजनेतही वीजग्राहकास प्रत्येकी ६५ रुपयांमध्ये १० एलईडी दिवे मिळणार आहेत. यामध्ये वीजबिलातून मासिक कपातीचा पर्यायही असणार आहे.योजनेच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे; मात्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. पुण्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये विदर्भातही योजना सुरु होणार असून, सुरुवात अकोला शहरातून होणार आहे. - दीपक कोकाटे, प्रादेशिक व्यवस्थापक, ईईएसएल, मुंबई.