शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

उष्णतेच्या लाटेचे आणखी ९ बळी

By admin | Updated: May 21, 2016 06:11 IST

राज्यातील अतिउष्णतेच्या लाटेने शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही नऊ जणांचा बळी घेतला.

पुणे/जळगाव/बुलढाणा : राज्यातील अतिउष्णतेच्या लाटेने शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही नऊ जणांचा बळी घेतला. विदर्भ, खान्देशातील होरपळ कायम असून, सर्वाधिक तापमान उपराजधानी नागपुरात ४५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील २४ तास राज्याचे तापमान चढेच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने चढाच आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून अतिउष्णतेची लाट आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक होरपळ विदर्भ, खान्देशवासीयांची होत आहे. या लाटेत बुधवारी आठ तर सगल दुसऱ्या दिवशी गुरुवारी १४ जणांचा बळी गेला. पाठोपाठ शुक्रवारी नऊ जणांचा बळी गेला. मृतांमध्ये सहा जण खान्देशातील तर तीन जण विदर्भातील आहेत. धुळे जिल्ह्यातील विकास माळी, मिलिंद चित्ते आणि जळगाव जिल्ह्यातील मनोज भादलीकर, सुनील शालिग्राम, वाणी येथील रवीकांत चौधरी आणि रघुनाथ बाविस्कर अशी खान्देशातील मृतांची नावे आहेत. अकोल्यात शिवहरी धाडसे (७०) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. बुलडाण्यातील कांद्याचे व्यापारी बशीरखान अब्दुल्लाखान पठान (६५) आणि मोताळा येथील सुभाष दोडे (६३) यांचाही उष्माघाताने बळी गेला.

>भरपाईचा प्रस्तावउष्माघातामुळे मृत्यू झाल्यास संबंधितांच्या कुटुंबीयास नुकसानभरपाई मिळावी यासाठी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करणार असल्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : नागपूर ४५.६, वर्धा ४५.५, अमरावती ४५.२, चंद्रपूर ४५, यवतमाळ व ब्रह्मपुरी ४४.५, नांदेड ४४, अकोला ४३.८, मालेगाव ४३.६, बीड ४३.२, गोंदिया ४२.६, सोलापूर ४०.१, औरंगाबाद ४१, अहमदनगर ४०.८, वाशिम व बुलडाणा ४०.६, नाशिक ३६.८, पुणे ३५.९, डहाणू ३५.७, सातारा ३५.६, मुंबई ३५.४ आणि रत्नागिरी ३४.४. मॉन्सूनची आगेकूच सुरूच!नैर्ऋ त्य मोसमी पावसाने (मॉन्सून) शुक्रवारी आगेकूच करीत संपूर्ण अंदमान-निकोबार बेट व्यापले. त्याचबरोबर मॉन्सूनने आग्नेय बंगाल उपसागराचा आणखी भागही व्यापला. मॉन्सून सक्रिय असल्याने अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडत आहे.