शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

उष्णतेच्या लाटेचे आणखी ९ बळी

By admin | Updated: May 21, 2016 06:11 IST

राज्यातील अतिउष्णतेच्या लाटेने शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही नऊ जणांचा बळी घेतला.

पुणे/जळगाव/बुलढाणा : राज्यातील अतिउष्णतेच्या लाटेने शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही नऊ जणांचा बळी घेतला. विदर्भ, खान्देशातील होरपळ कायम असून, सर्वाधिक तापमान उपराजधानी नागपुरात ४५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील २४ तास राज्याचे तापमान चढेच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने चढाच आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून अतिउष्णतेची लाट आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक होरपळ विदर्भ, खान्देशवासीयांची होत आहे. या लाटेत बुधवारी आठ तर सगल दुसऱ्या दिवशी गुरुवारी १४ जणांचा बळी गेला. पाठोपाठ शुक्रवारी नऊ जणांचा बळी गेला. मृतांमध्ये सहा जण खान्देशातील तर तीन जण विदर्भातील आहेत. धुळे जिल्ह्यातील विकास माळी, मिलिंद चित्ते आणि जळगाव जिल्ह्यातील मनोज भादलीकर, सुनील शालिग्राम, वाणी येथील रवीकांत चौधरी आणि रघुनाथ बाविस्कर अशी खान्देशातील मृतांची नावे आहेत. अकोल्यात शिवहरी धाडसे (७०) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. बुलडाण्यातील कांद्याचे व्यापारी बशीरखान अब्दुल्लाखान पठान (६५) आणि मोताळा येथील सुभाष दोडे (६३) यांचाही उष्माघाताने बळी गेला.

>भरपाईचा प्रस्तावउष्माघातामुळे मृत्यू झाल्यास संबंधितांच्या कुटुंबीयास नुकसानभरपाई मिळावी यासाठी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करणार असल्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : नागपूर ४५.६, वर्धा ४५.५, अमरावती ४५.२, चंद्रपूर ४५, यवतमाळ व ब्रह्मपुरी ४४.५, नांदेड ४४, अकोला ४३.८, मालेगाव ४३.६, बीड ४३.२, गोंदिया ४२.६, सोलापूर ४०.१, औरंगाबाद ४१, अहमदनगर ४०.८, वाशिम व बुलडाणा ४०.६, नाशिक ३६.८, पुणे ३५.९, डहाणू ३५.७, सातारा ३५.६, मुंबई ३५.४ आणि रत्नागिरी ३४.४. मॉन्सूनची आगेकूच सुरूच!नैर्ऋ त्य मोसमी पावसाने (मॉन्सून) शुक्रवारी आगेकूच करीत संपूर्ण अंदमान-निकोबार बेट व्यापले. त्याचबरोबर मॉन्सूनने आग्नेय बंगाल उपसागराचा आणखी भागही व्यापला. मॉन्सून सक्रिय असल्याने अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडत आहे.