शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

स्वाइन फ्लूचे ९ बळी, १३५ जणांना लागण

By admin | Updated: June 28, 2017 03:22 IST

कधी उकाडा तर कधी गारवा अशाप्रकारे वातावरण सतत बदलत असल्याने मागील तेरा दिवसात ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने पाच

पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कधी उकाडा तर कधी गारवा अशाप्रकारे वातावरण सतत बदलत असल्याने मागील तेरा दिवसात ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने पाच जण दगावले असून तब्बल ८४ रुग्ण वाढले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात नऊ जण दगावले असून त्यातील सहा रुग्ण ठाणे पालिकेच्या हद्दीतील आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीला १३५ जणांना स्वाइनची लागण झाली असून त्यातील १०६ रुग्ण ठाणे शहरातील आहेत. ठाण्यातील स्वाइनचे रुग्ण हे प्रामुख्याने उच्चभ्रू वस्तीतील आहेत. याचदरम्यान, गेल्या सहा महिन्यात जिल्हाभरातून स्वाइन फ्लूच्या संशयित ९२ हजार ७१० रुग्णांची तपासणी केली आहे. यातील १० हजार ६९ रुग्णांची गत १३ दिवसात तपासणी करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा हा ग्रामीण आणि शहरी असा असून या जिल्ह्यात एकूण सहा महापालिका आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी विशेष कक्ष स्थापन केलेले आहेत. तर त्या-त्या रुग्णालयात स्कॅनिंग सेंटर उभारलेले आहेत. याचदरम्यान, १ जानेवारी ते २४ जूनदरम्यान या आजारासंदर्भात एकूण ९२ हजार ७१० जणांची तपासणी केलेली आहे. त्यामध्ये १६० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १३५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील ६५ जण अजूनही उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाण्यात- ६, मीरा-भार्इंदर -२, आणि कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील एकाचा समावेश आहे.ठाणे जिल्ह्यातील सहा पैकी चार महापालिकेत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. या काळात उल्हासनगर आणि भिवंडी या दोन्ही महापालिकेच्या हद्दीत अद्याप एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही. उल्हासनगरात एक संशयित पुढे आला होता. पण, त्याला स्वाइन फ्लू झाला नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. तर नवी मुंबईत आतापर्यंत ३ संशयित आढळले असून त्यातील दोघाना घरी सोडण्यात आले असून एकावर उपचार सुरू आहेत.