शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

वीज पडून ९ ठार, १३ जखमी

By admin | Updated: September 15, 2014 00:58 IST

चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावतीत दोन व गडचिरोली जिल्ह्यात दोन बळी चंद्रपूर/गडचिरोली/अमरावती : रविवारी वीज पडल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावती

एका बैलाचाही मृत्यू : चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावतीत दोन व गडचिरोली जिल्ह्यात दोन बळी चंद्रपूर/गडचिरोली/अमरावती : रविवारी वीज पडल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावती जिल्ह्यात दोन आणि गडचिरोली जिल्ह्यात दोन असे सहा नागरिक जागीच ठार झाले तर नऊ जण जखमी झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात धाबापासून काही अंतरावर असलेल्या वामनपल्ली शेतशिवारात लैलाबाई रावजी गेडाम (४०), गौतम मानकर (३२), गीताबाई चंद्रकांत येवले (४५) रा. विसापूर व चिमूर तालुक्यातील मसली गावाजवळील शेतशिवारात इंद्रजित नन्नावरे (३५) आणि शनिवारी सायंकाळी ब्रह्मपुरी तालुक्यात कुडेसावली येथील रमेश विठोबा गुरुनुले (४०) तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जिमलगट्टा येथून दोन किमी अंतरावर असलेल्या रसपल्ली गावाजवळ रविवारी ४ वाजताच्या सुमारास विजय बापू कोठारी (३०) रा. मालागुड्डम, नीलेश तुळशिराम जरपला (१३) रा. रसपल्ली आणि अमरावती जिल्ह्यात प्रवीण गुलाबराव इंगळे (३५) व अर्चना प्रवीण इंगळे (३० दोन्ही रा.खेडपिंप्री) या पती-पत्नीचा मृत्यू झाला. जखमींमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात मसलीजवळचे दिलीप सोयाम, सावरगावजवळचे राजू जीवतोडे, संजय जीवतोडे, तळोधी नाईकचे कमलाकर सोनवणे आणि गडचिरोली जिल्ह्यात शंकर मलय्या गोमासे (३४) रा. रसपल्ली, मन्तेश पोचा दुर्गे (२८) रा. मालागुड्डम, मधुकर राजा दुर्गे (४५) रा. मालागुड्डम, भीमा पेंटा कुळमेथे (४०) रा. येदरंगा, नितीन महेंद्र जनगम (१०) रा. मालागुड्डम, राजू रामू बानेत (५०) रा. रसपल्ली, नरेंद्र बालाजी जनगम (२८) रा. मालागुड्डम, बंगो बंडे गावळे (५५) रा. येदरंगा, मोहन मधुकर अजमेर (३०) रा. रसपल्ली यांचा समावेश आहे.गोंडपिपरी तालुक्यात धाबापासून काही अंतरावर वामनपल्ली शेतशिवारात लैलाबाई गेडाम काम करीत होती. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आल्याने ती शेताच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील आंब्याच्या झाडाखाली आली. दरम्यान, गौतम मानकर व पटवारी ए.डी. चौधरी हे तिथूनच दुचाकीने जात होते. पावसामुळे तेही त्याच रस्त्यावर दुसऱ्या झाडाखाली थांबले. मात्र गौतम मानकर हे लैलाबाई थांबून असलेल्या आंब्याच्या झाडाखाली गेले. तिथेच वीज कोसळली. यात गौतम मानकर व लैलाबाई गेडाम या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पटवारी चौधरी दुसऱ्या झाडाखाली असल्याने बचावले. झोपडीतच पती-पत्नीचा मृत्यू अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेडपिंप्री येथे प्रवीण गुलाबराव इंगळे (३५) व अर्चना प्रवीण इंगळे (३०) पती-पत्नी शेतात फवारणीचे काम सुरु असल्याने शेतात गेले होते. परंतु दुपारी ४.३० वाजतापासून अचानक विजांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हे दाम्पत्य शेतातीलच झोपडीत शिरले आणि याचवेळी झोपडीवर वीज कोसळल्याने दोघांचाही भाजल्याने मृत्यू झाला. वीज पडल्याने शेतातील झोपडीही बेचिराख झाली.