शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

मीरा-भार्इंदरमध्ये ९७ कुपोषित बालके

By admin | Updated: July 15, 2017 03:17 IST

बालवाड्यांतील मुलांच्या तपासणीत तब्बल ३४ तीव्र व ६३ मध्यम गटातील अशी मिळून ९७ कुपोषित बालके आढळली आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील अंगणवाडी, बालवाड्यांतील मुलांच्या तपासणीत तब्बल ३४ तीव्र व ६३ मध्यम गटातील अशी मिळून ९७ कुपोषित बालके आढळली आहेत. त्यांच्यावर उपचार, मार्गदर्शनासाठी शहरात पोषण पुनर्वसन केंद्रच नसल्याने कुपोषणग्रस्त बालकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये शहरी भागातील ४२ व ग्रामीण भागातील ३९ अंगणवाड्या आहेत. तर, महापालिकेच्या बालवाड्यांची संख्या २६ आहे. या अंगण व बालवाड्यांमध्ये ८ हजार ३४३ मुले आहेत. अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना तसेच स्तनदा मातांना एकात्मिक बालविकास प्रकल्प माध्यमातून सकस आहाराचा पुरवठा व्हायला हवा. यात लापशी, खिचडी, पुलाव, चण्याची उसळ, गूळ, कुरमुरा लाडू, भेळेचा समावेश आहे. ही कामे महिला बचत गटांना देण्यात आली आहेत. सकस आहारासाठी सरकारी तिजोरीतून लाखोंचा खर्च दाखवला जातो. प्रत्यक्षात सकस आहार पुरवला जात नसल्याची ओरड सतत होते. गूळ-शेंगदाणा लाडू तर आता बंदच झाला आहे. बालवाड्यांतही निकृष्ट खाऊ पुरवल्याची प्रकरणे यापूर्वीच उघड झाली होती. अंगणवाडी व बालवाड्यांमधील सहा वर्षांपर्यंतच्या मुलांची वर्षातून दोनदा वैद्यकीय तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये मागील दोन महिन्यांत तब्बल ३४ तीव्र कुपोषणग्रस्त, तर ६३ मध्यम कुपोषणग्रस्त बालके आढळली आहेत. त्यांना व त्यांच्या मातांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करणे आवश्यक आहे. परंतु, मीरा-भार्इंदरमध्ये असे केंद्रच नाही. पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातच दोन कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची संकल्पना आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी मांडली होती. परंतु, सहा महिने उलटूनही पालिका केंद्र सुरू करू शकलेली नाही. >केंद्र रखडलेपालिकेने पोषण पुनर्वसन केंद्र तयार केले आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता होताच हे केंद्र सुरू होणार आहे. मीरा-भार्इंदरमधीलच नव्हे तर ठाणे, पालघर जिल्ह्यांतील कुपोषणग्रस्त बालकांना सकस आहारासह मार्गदर्शन व उपचार मिळणार आहे, असे डॉ. अंजली पाटील म्हणाल्या.