शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी ९२०० कोटी

By admin | Updated: May 4, 2016 04:43 IST

राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील १३२ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार २०० कोटी रुपये तर अवर्षणप्रवण तालुक्यांमधील प्रकल्पांसाठी २ हजार कोटी रुपये केंद्र

मुंबई : राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील १३२ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार २०० कोटी रुपये तर अवर्षणप्रवण तालुक्यांमधील प्रकल्पांसाठी २ हजार कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७ हजार २०० कोटी रुपये मिळणार असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. एकूण १३२ सिंचन प्रकल्पांपैकी ९८ विदर्भातील आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४ हजार ९८ कोटी रुपयांची गरज असून ते पूर्ण झाल्यानंतर १ लाख ४० हजार ६११ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. मराठवाड्यातील ३४ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार १८७ कोटी रुपये लागणार असून ते पूर्ण झाल्यानंतर २ लाख १८ हजार ७०१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंर्तगत देशातील ८९ विशेष सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. यातून देशात साधारण ८० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. महाराष्ट्रातील २६ विशेष सिंचन प्रकल्पांचा यात समावेश आहे. यातून राज्यात अंदाजे २० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. या प्रकल्पांची एकूण किंमत साधारण ३८ हजार कोटी रु पये इतकी आहे. भूसंपादनामुळे या प्रकल्पांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यांना वाढीव किंमतीनुसार मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली. ती उमा भारती यांनी मान्य केली. तसेच महाराष्ट्रातील कोणत्या सिंचन प्रकल्पाला किती निधीची गरज आहे, याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या बैठकीला राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, केंद्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे विशेष सचिव अमरजित सिंह, राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)तापी मेगाचा डीपीआर : तापी मेगा रिचार्जमुळे उत्तर महाराष्ट्रातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) लवकरात लवकर सादर करण्यात यावा, असे उमा भारती यांनी यावेळी सांगितले. तसेच दमणगंगा पिंजाळ प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असेही त्या म्हणाल्या. या प्रकल्पामुळे मुंबईच्या २०६० पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गोसीखुर्दसाठी समितीगोसीखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाचा या वेळी आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प येत्या ३ वर्षांत पूर्ण करावयाचा असल्याचे सांगितले. त्यासाठी जलसंपदा विभागाचे केंद्रीय विशेष सचिव अमरजित सिंह यांची एक समिती नियुक्त करण्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. गोसीखुर्दसाठी केंद्र सरकारकडून ९० टक्के आणि राज्याकडून १० टक्के यानुसार निधी देण्यात येईल, असे उमा भारती यांनी सांगितले. यांना होणार फायदाविदर्भ (प्रकल्प संख्या) : अमरावती २६, अकोला १२, वाशिम २९, यवतमाळ १६, बुलडाणा १०, वर्धा ५. एकूण ९८. मराठवाडा : औरंगाबाद ७, जालना ४, परभणी १, हिंगोली १, नांदेड ५, बीड २, लातूर १०, उस्मानाबाद ४