शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
4
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
5
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
6
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
7
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
8
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
9
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
10
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
11
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
12
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
13
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
14
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

सिंचनासाठी ९२०० कोटी

By admin | Updated: May 4, 2016 04:43 IST

राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील १३२ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार २०० कोटी रुपये तर अवर्षणप्रवण तालुक्यांमधील प्रकल्पांसाठी २ हजार कोटी रुपये केंद्र

मुंबई : राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील १३२ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार २०० कोटी रुपये तर अवर्षणप्रवण तालुक्यांमधील प्रकल्पांसाठी २ हजार कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७ हजार २०० कोटी रुपये मिळणार असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. एकूण १३२ सिंचन प्रकल्पांपैकी ९८ विदर्भातील आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४ हजार ९८ कोटी रुपयांची गरज असून ते पूर्ण झाल्यानंतर १ लाख ४० हजार ६११ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. मराठवाड्यातील ३४ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार १८७ कोटी रुपये लागणार असून ते पूर्ण झाल्यानंतर २ लाख १८ हजार ७०१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंर्तगत देशातील ८९ विशेष सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. यातून देशात साधारण ८० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. महाराष्ट्रातील २६ विशेष सिंचन प्रकल्पांचा यात समावेश आहे. यातून राज्यात अंदाजे २० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. या प्रकल्पांची एकूण किंमत साधारण ३८ हजार कोटी रु पये इतकी आहे. भूसंपादनामुळे या प्रकल्पांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यांना वाढीव किंमतीनुसार मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली. ती उमा भारती यांनी मान्य केली. तसेच महाराष्ट्रातील कोणत्या सिंचन प्रकल्पाला किती निधीची गरज आहे, याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या बैठकीला राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, केंद्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे विशेष सचिव अमरजित सिंह, राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)तापी मेगाचा डीपीआर : तापी मेगा रिचार्जमुळे उत्तर महाराष्ट्रातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) लवकरात लवकर सादर करण्यात यावा, असे उमा भारती यांनी यावेळी सांगितले. तसेच दमणगंगा पिंजाळ प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असेही त्या म्हणाल्या. या प्रकल्पामुळे मुंबईच्या २०६० पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गोसीखुर्दसाठी समितीगोसीखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाचा या वेळी आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प येत्या ३ वर्षांत पूर्ण करावयाचा असल्याचे सांगितले. त्यासाठी जलसंपदा विभागाचे केंद्रीय विशेष सचिव अमरजित सिंह यांची एक समिती नियुक्त करण्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. गोसीखुर्दसाठी केंद्र सरकारकडून ९० टक्के आणि राज्याकडून १० टक्के यानुसार निधी देण्यात येईल, असे उमा भारती यांनी सांगितले. यांना होणार फायदाविदर्भ (प्रकल्प संख्या) : अमरावती २६, अकोला १२, वाशिम २९, यवतमाळ १६, बुलडाणा १०, वर्धा ५. एकूण ९८. मराठवाडा : औरंगाबाद ७, जालना ४, परभणी १, हिंगोली १, नांदेड ५, बीड २, लातूर १०, उस्मानाबाद ४