शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

राज्यातील ८६ साखर कारखाने बंद

By admin | Updated: January 31, 2017 00:46 IST

राज्यातील ८६ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, त्यात पुणे विभागातील ३१ कारखान्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १५० कारखान्यांमधून ३२९.५४ लाख टन

पुणे : राज्यातील ८६ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, त्यात पुणे विभागातील ३१ कारखान्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १५० कारखान्यांमधून ३२९.५४ लाख टन गाळपातून ३६१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात यंदा ८८ सहकारी व ६२ खासगी साखर कारखाने सुरू होते. कोल्हापुर विभागातील विभागातील ११ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. पुणे विभागातील ५२ कारखान्यांमधून १२४ लाख टन ऊस गाळपातून १३४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, १०.८१ टक्के साखर उतारा मिळाला. नगरमधील २३ कारखान्यांमधून ३८.३७ लाख टन ऊस गाळपातून ३७.३० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. येथील साखरेचा सरासरी उतारा ९.७२ टक्के आहे. या विभागातील १९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. औरंगाबाद येथील १७ कारखान्यांतून २१.४६ लाख टन ऊस गाळपातून १९.१४ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. साखर उतारा ८.९२ टक्के असून, १३ कारखानांचा हंगाम उरकला आहे. नांदेडमधील ११ कारखान्यांतून १०.५८ लाख टन ऊस गाळपातून १०.४२ लाख क्विंटल, तर अमरावतीतील ३ कारखान्यांमधून २.४३ लाख टन ऊस गाळपातून २.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. नांदेडमधील ९, तर अमरावतीतील तिनही कारखाने बंद आहेत. नागपूरच्या ४ कारखान्यांमधून ३.६३ लाख टन ऊस गाळपातून ३६१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १०.९७ टक्के मिळाला (प्रतिनिधी)६२ कारखानेच सुरूराज्यात यंदा ८८ सहकारी व ६२ खासगी साखर कारखाने सुरू होते. कोल्हापुर विभागातील ४० सहकारी व खासगी साखर कारखान्यांमधून १२९ लाख टन ऊस गाळपातून १५४.७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.