शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

राज्यातील ८६ साखर कारखाने बंद

By admin | Updated: January 31, 2017 00:46 IST

राज्यातील ८६ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, त्यात पुणे विभागातील ३१ कारखान्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १५० कारखान्यांमधून ३२९.५४ लाख टन

पुणे : राज्यातील ८६ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, त्यात पुणे विभागातील ३१ कारखान्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १५० कारखान्यांमधून ३२९.५४ लाख टन गाळपातून ३६१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात यंदा ८८ सहकारी व ६२ खासगी साखर कारखाने सुरू होते. कोल्हापुर विभागातील विभागातील ११ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. पुणे विभागातील ५२ कारखान्यांमधून १२४ लाख टन ऊस गाळपातून १३४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, १०.८१ टक्के साखर उतारा मिळाला. नगरमधील २३ कारखान्यांमधून ३८.३७ लाख टन ऊस गाळपातून ३७.३० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. येथील साखरेचा सरासरी उतारा ९.७२ टक्के आहे. या विभागातील १९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. औरंगाबाद येथील १७ कारखान्यांतून २१.४६ लाख टन ऊस गाळपातून १९.१४ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. साखर उतारा ८.९२ टक्के असून, १३ कारखानांचा हंगाम उरकला आहे. नांदेडमधील ११ कारखान्यांतून १०.५८ लाख टन ऊस गाळपातून १०.४२ लाख क्विंटल, तर अमरावतीतील ३ कारखान्यांमधून २.४३ लाख टन ऊस गाळपातून २.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. नांदेडमधील ९, तर अमरावतीतील तिनही कारखाने बंद आहेत. नागपूरच्या ४ कारखान्यांमधून ३.६३ लाख टन ऊस गाळपातून ३६१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १०.९७ टक्के मिळाला (प्रतिनिधी)६२ कारखानेच सुरूराज्यात यंदा ८८ सहकारी व ६२ खासगी साखर कारखाने सुरू होते. कोल्हापुर विभागातील ४० सहकारी व खासगी साखर कारखान्यांमधून १२९ लाख टन ऊस गाळपातून १५४.७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.