शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

आरटीई प्रवेशासाठी ८५० अर्ज दाखल

By admin | Updated: April 27, 2016 01:51 IST

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशासाठी नियुक्त केलेल्या मदत केंद्राच्या माध्यमातून ८८३ पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.

पिंपरी : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशासाठी नियुक्त केलेल्या मदत केंद्राच्या माध्यमातून ८८३ पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. आरटीई प्रवेशाची अंतिम मुदत गुरुवारपर्यंत (दि. २८)आहे.पिंपरी-चिचंवडमधील १५० शाळांच्या २३०० जागांसाठी हे अर्ज आले आहेत. प्रवेशासाठी पालकांनी या वेळी सायबर कॅफेवर जास्त प्रमाणात अर्ज भरले. आरटीई केंद्रावर कमी अर्ज भरले गेले. त्यामुळे प्रवेशाची एकूण आकडेवारी उपलब्ध झाली नाही. आरटीई प्रवेश १४ एप्रिलपासून सुरू झाले. भोसरीतील संत साई इंग्लिश स्कूल, दिघीतील हॉरिझन स्कूल, आकुर्डीतील बीना इंग्लिश मीडिअम स्कूल, शाहूनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, मोरवाडीतील एसएनबीपी स्कूल, पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपळे-गुरवमधील किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूल, सांगवीतील एम. एस. कीड्स, वाकडमधील एस. पी. स्कूल, काळेवाडीतील एम. एम. विद्यामंदिर या ठिकाणी प्रवेश सुरू आहेत. प्रवेशाचे कामकाज एकूण दहा केंद्रांवर काम सुरू आहे. यासाठी विषयतज्ज्ञ व पर्यवेक्षक काम पाहत आहेत.गतवर्षी आरटीई प्रवेशाच्या झालेल्या गोंधळामुळे या वर्षी सुबद्ध नियोजन व मदत केंद्रामुळे बऱ्याच अंशी सर्व कामकाज सुरळीत झाले. तसेच, या वर्षी पालकांनी कागदपत्रांची जुळवाजुळवही वेळेत केली होती. तसेच बऱ्याच पालकांनी या वर्षी प्रवेश अर्ज वेळेत भरल्याने सर्व्हरवर ताण आला नाही. मात्र, पालकांच्या खिशाला भुर्दंड बसला. यासाठी पैसे भरून रांगेत उभे न राहताच अर्ज भरता येत आहेत. त्यामुळे आरटीईसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांना पालकांच्या संख्येतही मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी) >प्रवेश अर्ज : यंदा दुपटीने वाढप्रवेशाचे अर्ज पालकांनी भरणे पसंत केले. प्रवेशासाठी गतवर्षी बराच वेळ लागल्याने या वर्षी पालकांनी दक्षता घेतली. अर्जात नमूद केलेल्या क्रमांकावर आरटीई संदर्भातील मेसेज पालकांना मिळणार आहेत. आरटीई प्रवेश लकी ड्रॉ पद्धतीने निश्चित होणार आहेत, अशी माहिती प्रशासन अधिकारी बी. सी. कारेकर यांनी दिली. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी पुणे विभागात ७ हजार ९०० जागांसाठी आतापर्यंत सुमारे १५ हजार अर्ज आले आहेत. हे अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने पुन्हा २८ एप्रिलपर्यंत मुदत वाढविली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.