शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

तस्करीसाठी आणलेल्या ८३ बालकांची सुटका

By admin | Updated: December 16, 2014 03:45 IST

चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून बिहार येथून आणलेल्या ८३ बालकामगारांची आज लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुटका करण्यात आली.

मुंबई : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून बिहार येथून आणलेल्या ८३ बालकामगारांची आज लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुटका करण्यात आली. यामध्ये ६ ते १६ वयोगटातील मुलांचा समावेश असून, कुर्ला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात ३३ जणांना ताब्यात घेतले आहे.गेल्या काही वर्षांपासून इतर राज्यांतील अल्पवयीन मुलांच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक पालक काही रुपयांसाठी आपल्या मुलांना एजंट लोकांच्या हाती देऊन मुंबईसारख्या शहरात पाठवतात. अशाच प्रकारे बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातून काही अल्पवयीन मुलांना कामासाठी मुंबईत पाठवण्यात येणार असल्याची माहिती ‘प्रथम’ या सामाजिक संस्थेला मिळाली होती. या संस्थेचे काही कार्यकर्ते अनेक दिवसांपासून यावर लक्ष ठेवून होते. त्यानुसार शनिवारी १५० अल्पवयीन मुलांना मुंबईकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती बिहारमधील कार्यकर्त्यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांना दिली.सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही सर्व मुले जनसाधारण एक्स्प्रेसने मुंबईत दाखल होणार होती. त्यामुळे ‘प्रथम’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब कुर्ला रेल्वे पोलिसांना सांगितली. पोलिसांनीदेखील याबाबत तत्काळ दखल घेऊन आज पहाटे ५ वाजल्यापासूनच लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सापळा रचला होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही गाडी सकाळी ६ऐवजी ११ वाजता आली. पोलिसांनी त्यांची तत्काळ चौकशी केली असता, त्यांच्यासोबत त्यांचा कोणीही जवळचा नातेवाईक नसल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी या सर्व मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यातील काही मुले ही १७ वर्षांपेक्षा अधिक वयाची होती, त्यामुळे पोलिसांनी काही मुलांना सोडून दिले. मात्र यातील ८३ मुले ही १४ वर्षांखालील असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच या वेळी पोलिसांनी या मुलांना घेऊन येणाऱ्या ३३ जणांनादेखील ताब्यात घेतले. या सर्व मुलांना धारावी, गोवंडी आणि मानखुर्दसारख्या परिसरात असलेल्या बेकऱ्या, हॉटेल्स आणि काही कारखान्यांमध्ये नोकरीला ठेवण्यात येणार असल्याची माहिती ‘प्रथम’ संस्थेच्या मॅनेजर शर्मिष्ठा खंडागळे यांनी दिली. तसेच यामध्ये एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता रेल्वे पोलिसांकडून वर्तवण्यात आली असून, याबाबत योग्य चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय थोपवळकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)