शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

८२व्या वर्षीही कलेला न्याय देणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 01:37 IST

आपला उदरनिर्वाह करणे असा दिनक्रम असणारा अवलिया उतारवयातदेखील तरुणांना लाजवेल अशी कामे मोठ््या उत्साहाने करीत आहे.

आंबेठाण : वयाची ८२ वर्षे पार केलेली. परंतु पहाटे कोंबड आरवल्यापासून ते संध्याकाळी दिवस उतरणीला जाईपर्यंत आपल्या अंगात असलेली कला कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्याद्वारे आपला उदरनिर्वाह करणे असा दिनक्रम असणारा अवलिया उतारवयातदेखील तरुणांना लाजवेल अशी कामे मोठ््या उत्साहाने करीत आहे. बळीराम तुकाराम कदम असे या अवलिया ज्येष्ठ कलाकाराचे नाव आहे.खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक (ठाकूर पिंपरी) गावचे नागरिक असणाऱ्या कदमबाबांना पाहिले तर निश्चितच तरुणांना देखील लाजवेल असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. वयाची ८२ वर्षे पार केल्यानंतरसुद्धा सुतारकाम हा पारंपरिक व्यवसाय आजदेखील ते नेटाने संभाळत आहेत. सुतारकामाबरोबरच लोहारकाम, गवंडीकाम, तसेच वेल्डिंगचे कामदेखील ते अचूकपणे करतात. साधारणत: वयाची साठी पार केल्यानंतर माणूस उद्योग व्यवसाय किंवा नोकरीच्या नादी न लागता रिटायर आयुष्य जगतो परंतु बळीराम कदम यांनी या गोष्टींना छेद देत तरुणांनादेखील नवा आदर्श घालून दिला आहे.पारंपरिक काळापासून सुरु असणारा व्यवसाय आणि त्याला आधुनिकतेची जोड देत व्यवसाय करून आपल्या लाकडी हस्तकलेच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्यातदेखील कदम यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या हातून तयार झालेली जुन्या काळातील मोठी घरे आजही त्यांच्या कलेची साक्ष देत आहेत. तालुक्यात आजवर जी अनेक मोठी घराणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अशा अनेक घरांची रचना कदम यांच्या हातून झाली आहे. याशिवाय जुन्या काळात त्यांनी बनविलेल्या शाळा आजही ताठ मानेने उभ्या आहेत.माळकरी असणारे कदमबाबा आपल्या उतारवयातदेखील आळंदी आणि पंढरपूरची वारी करीत आहेत. बळीराम तुकाराम कदम हे ८२ वर्षांचा कलाकार आजही आपल्या लाकडी हस्तकलेच्या माध्यमातून शेकडो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करीत आहे. सुतारकाम हा आपला पारंपरिक व्यवसाय कदम यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून काळानुसार बदलला आहे. त्यांची मुले आणि नातवंडेदेखील त्यांना या व्यवसायात मदत करीत आहेत. शेती व्यवसाय करीत असताना सुतारकाम हा आपला परंपरागत व्यवसायात कदम यांनी काळानुरूप बदल करीत मोठ्या शिताफीने वाढविला आहे.परिसरात किंवा कधी दूरवर असणारी जुनी घरे, जुने वाडे याशिवाय अन्य ठिकाणी मिळणारे सागवानी लाकूड खरेदी करणे आणि त्याचा वापर व्यवसायासाठी करणे हे बळीराम कदम यांचे प्रमुख काम आहे. हे सुतारकाम करीत असताना ते सागवानी लाकडापासून बनविलेली बैलगाडी, बैलगाडे, स्वयंपाकघरात वापरले जाणारे लाटणे, पोळपाट, लहान मुलांचे बाहुला-बाहुली, खेळण्याचे विविध साहित्य, लहान मुलांचे पाळणे, लग्न समारंभात झालीवर ठेवले जाणारे चौरंग, पाट अतिशय सुबक आणि आखीव-रेखीव बनवतात आणि त्याची विक्री करून कदम आपला प्रपंच चालवीत आहे. याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांना नवीन शेती अवजारे बनवून देणे, त्यांची दुरुस्ती करणे अशी कामेदेखील या कलाकाराकडून केली जात आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना शेतकामात दैनंदिन वापरात लागणारे खुरपे, विळे, कुदळ, टिकाव, पहार यांसारखी अवजारे करून देतात. >दिवसेंदिवस शेती करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे त्यामुळे अनेक शेतकरी निदान लहानशी बैलगाडी तरी आपल्या घरात असावी म्हणून अशा लाकडी बैलगाड्या तयार करून घेत आहेत.याशिवाय बहुजनांचा आवडता खेळ असणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यती. असे बैलगाडेदेखील अनेक लोक आवडीने बनवून घेतात आणि हौस म्हणून घरी ठेवतात.असे काम करताना वारंवार होत असणाऱ्या भारनियमनाचा फटका देखील त्यांच्या कामाला बसत आहे. नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू बनवून देणे आणि बनवून दिलेली वस्तू पाहिल्यानंतर ग्राहकाच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हाच आपला कामाचा खरा मोबदला असल्याचे बळीरामदादा कदम हे आवर्जून सांगतात.