शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

८२व्या वर्षीही कलेला न्याय देणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 01:37 IST

आपला उदरनिर्वाह करणे असा दिनक्रम असणारा अवलिया उतारवयातदेखील तरुणांना लाजवेल अशी कामे मोठ््या उत्साहाने करीत आहे.

आंबेठाण : वयाची ८२ वर्षे पार केलेली. परंतु पहाटे कोंबड आरवल्यापासून ते संध्याकाळी दिवस उतरणीला जाईपर्यंत आपल्या अंगात असलेली कला कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्याद्वारे आपला उदरनिर्वाह करणे असा दिनक्रम असणारा अवलिया उतारवयातदेखील तरुणांना लाजवेल अशी कामे मोठ््या उत्साहाने करीत आहे. बळीराम तुकाराम कदम असे या अवलिया ज्येष्ठ कलाकाराचे नाव आहे.खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक (ठाकूर पिंपरी) गावचे नागरिक असणाऱ्या कदमबाबांना पाहिले तर निश्चितच तरुणांना देखील लाजवेल असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. वयाची ८२ वर्षे पार केल्यानंतरसुद्धा सुतारकाम हा पारंपरिक व्यवसाय आजदेखील ते नेटाने संभाळत आहेत. सुतारकामाबरोबरच लोहारकाम, गवंडीकाम, तसेच वेल्डिंगचे कामदेखील ते अचूकपणे करतात. साधारणत: वयाची साठी पार केल्यानंतर माणूस उद्योग व्यवसाय किंवा नोकरीच्या नादी न लागता रिटायर आयुष्य जगतो परंतु बळीराम कदम यांनी या गोष्टींना छेद देत तरुणांनादेखील नवा आदर्श घालून दिला आहे.पारंपरिक काळापासून सुरु असणारा व्यवसाय आणि त्याला आधुनिकतेची जोड देत व्यवसाय करून आपल्या लाकडी हस्तकलेच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्यातदेखील कदम यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या हातून तयार झालेली जुन्या काळातील मोठी घरे आजही त्यांच्या कलेची साक्ष देत आहेत. तालुक्यात आजवर जी अनेक मोठी घराणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अशा अनेक घरांची रचना कदम यांच्या हातून झाली आहे. याशिवाय जुन्या काळात त्यांनी बनविलेल्या शाळा आजही ताठ मानेने उभ्या आहेत.माळकरी असणारे कदमबाबा आपल्या उतारवयातदेखील आळंदी आणि पंढरपूरची वारी करीत आहेत. बळीराम तुकाराम कदम हे ८२ वर्षांचा कलाकार आजही आपल्या लाकडी हस्तकलेच्या माध्यमातून शेकडो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करीत आहे. सुतारकाम हा आपला पारंपरिक व्यवसाय कदम यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून काळानुसार बदलला आहे. त्यांची मुले आणि नातवंडेदेखील त्यांना या व्यवसायात मदत करीत आहेत. शेती व्यवसाय करीत असताना सुतारकाम हा आपला परंपरागत व्यवसायात कदम यांनी काळानुरूप बदल करीत मोठ्या शिताफीने वाढविला आहे.परिसरात किंवा कधी दूरवर असणारी जुनी घरे, जुने वाडे याशिवाय अन्य ठिकाणी मिळणारे सागवानी लाकूड खरेदी करणे आणि त्याचा वापर व्यवसायासाठी करणे हे बळीराम कदम यांचे प्रमुख काम आहे. हे सुतारकाम करीत असताना ते सागवानी लाकडापासून बनविलेली बैलगाडी, बैलगाडे, स्वयंपाकघरात वापरले जाणारे लाटणे, पोळपाट, लहान मुलांचे बाहुला-बाहुली, खेळण्याचे विविध साहित्य, लहान मुलांचे पाळणे, लग्न समारंभात झालीवर ठेवले जाणारे चौरंग, पाट अतिशय सुबक आणि आखीव-रेखीव बनवतात आणि त्याची विक्री करून कदम आपला प्रपंच चालवीत आहे. याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांना नवीन शेती अवजारे बनवून देणे, त्यांची दुरुस्ती करणे अशी कामेदेखील या कलाकाराकडून केली जात आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना शेतकामात दैनंदिन वापरात लागणारे खुरपे, विळे, कुदळ, टिकाव, पहार यांसारखी अवजारे करून देतात. >दिवसेंदिवस शेती करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे त्यामुळे अनेक शेतकरी निदान लहानशी बैलगाडी तरी आपल्या घरात असावी म्हणून अशा लाकडी बैलगाड्या तयार करून घेत आहेत.याशिवाय बहुजनांचा आवडता खेळ असणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यती. असे बैलगाडेदेखील अनेक लोक आवडीने बनवून घेतात आणि हौस म्हणून घरी ठेवतात.असे काम करताना वारंवार होत असणाऱ्या भारनियमनाचा फटका देखील त्यांच्या कामाला बसत आहे. नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू बनवून देणे आणि बनवून दिलेली वस्तू पाहिल्यानंतर ग्राहकाच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हाच आपला कामाचा खरा मोबदला असल्याचे बळीरामदादा कदम हे आवर्जून सांगतात.