शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ८.१९ कोटींचा निधी!

By admin | Updated: July 6, 2016 01:26 IST

निधीअभावी धूळ खात पडलेली अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंच्या नुकसानभरपाईची ११५५ प्रकरणे लवकरच निकाली निघणार.

संतोष वानखडे / वाशिम निधीअभावी धूळ खात पडलेली राज्यातील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंच्या नुकसानभरपाईची ११५५ प्रकरणे लवकरच निकाली निघण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाने ८.१९ कोटींचा निधी मंजूर केला असून, जिल्हास्तरावर निधी वितरणाची कार्यवाही सुरू आहे.विद्यार्थ्यांंच्या सुरक्षित शिक्षणासाठी शिक्षण विभागाने विविध योजना व उपक्रम अमलात आणले आहेत. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंंतच्या विद्यार्थ्यांंना संकटसमयी आर्थिक मदतीचा हात म्हणून २0१२-१३ पासून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना नियमितपणे राबविण्यात येत आहे. शिक्षण घेताना अपघात झाला तर संबंधित विद्यार्थ्याला आर्थिक स्वरूपात भरपाई दिली जाते. अपघाताचे स्वरूप पाहून आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम निश्‍चित केली जाते. अपघातग्रस्त विद्यार्थ्याने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांंमार्फत गटशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकार्‍याने माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.२0१५-१६ या वर्षात राज्यभरातून दीड हजारावर प्रस्ताव प्राप्त झाले होते; मात्र पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने ११५५ प्रस्ताव धूळ खात पडले होते. यामध्ये वाशिम जिल्हय़ातील ३५ विद्यार्थ्यांंचा समावेश आहे. निधीअभावी या अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंना भरपाईच्या रकमेची केवळ प्रतीक्षाच करावी लागली. विविध संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने जूनच्या तिसर्‍या आठवड्यात ८ कोटी १९ लाख ९३ हजार ६00 रुपये मंजूर करण्यात आले. सदर निधी आता जिल्हास्तरावर वितरित केला जात असून, लवकरच पात्र विद्यार्थ्यांंना नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. या निधीवर नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी पात्र विद्यार्थ्यांंना निधीचे वितरित करणार आहेत.