शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

मालवणच्या समुद्रात ८ जण बुडाले

By admin | Updated: April 16, 2017 04:47 IST

मालवणच्या तेली पाणंद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले सात महाविद्यालयीन विद्यार्थी व एक प्राध्यापक असे आठ जण शनिवारी बुडून मरण पावले.

सिंधुदुर्ग : मालवणच्या तेली पाणंद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले सात महाविद्यालयीन विद्यार्थी व एक प्राध्यापक असे आठ जण शनिवारी बुडून मरण पावले. समुद्रात भरती असल्याने ही दुर्घटना घडली. ते बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. दुर्घटनेतून तिघांना वाचविण्यात यश आले. दोन प्राध्यापकांसह हे ४७ विद्यार्थी कोकण दर्शन सहलीसाठी निघाले. पुण्याच्या औद्योगिक प्रकल्पाला व महाबळेश्वरला भेट देऊन ते शनिवारी मालवणला आले. सिंधुदुर्ग किल्ला पाहून ते वायरी किनाऱ्यावर आले. भरतीमुळे स्थानिकांनी पाण्यात न जाण्याच्या सूचना केल्या. तरीही सर्व ४७ जण समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ११ जण बुडू लागले. सहकाऱ्यांनी आरडाओरडा करताच स्थानिक मच्छीमार व स्कूबा ड्रायव्हरनी त्यांना बाहेर काढले. तोपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचे नातेवाईक सायंकाळी उशिरा येथे आले असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आले. आपत्कालीन यंत्रणा ‘फेल’- स्थानिकांनी जीव धोक्यात घालून पर्यटकांना समुद्राबाहेर काढले. मात्र, रूग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत न आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. - ‘किनाऱ्यावर जीवरक्षक नेमले खरे, पण त्यांना लागणाऱ्या आवश्यक साहित्याची पूर्तता झाली नाही, मग धोकादायक स्थितीत पर्यटकांचे जीव वाचवायचे कसे,’ असा सवालही त्यांनी केला. - सहलीसाठी महाविद्यालयाकडून परवानगी घेतली नव्हती. विद्यार्थी आणि दोन प्राध्यापक परस्पर मालवणला गेल्याचा खुलासा इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य उडुपी यांनी केला. मृतांची नावे...प्राध्यापक महेश कुडुचकर (वय ३५) तसेच नितीन मुनतवाडकर (२२), मुजमिल हन्नीकेरी (२२), किरण खांडेकर (२२), अवधूत ताशीलदार (२२), माया कोल्हे (२२), करुणा बेर्डे (२१) आणि आरती चव्हाण (२२)- मच्छीमार व स्कूबा डायव्हर यांच्या मदतीमुळे संकेत गाडवी (२३), अनिता हानळी (२२), आकांक्षा घाटगे (२२) यांना वाचविण्यात आले. आकांक्षाची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.