शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

मराठवाडा-विदर्भात ८ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 8, 2014 02:22 IST

दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नापिकीला कंटाळून आणखी सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नापिकीला कंटाळून आणखी सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. हिंगोली, नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यात या घटना घडल्या आहेत. तर, विदर्भात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.जळकोट (जि.लातूर) तालुक्यातील राम व्यंकटराव बिरादार (२७) या तरुण शेतकऱ्याने रविवारी दुपारी घरी गळफास घेऊन स्वत:ला संपविले. गेल्या दोन वर्षांपासून तो नापिकीला सामोरे जात आहे. शिवाय त्याच्यावर जिल्हा बँकेचे कर्ज होते. त्याच्या पश्चात पत्नी मुलगा आणि मुलगी आहे.रोहिणा (ता़ चाकूर, जि. लातूर) येथील गोविंद नारायण केंद्रे (५३) यांनी विषारी औषध प्राशन केले. शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला़ गेल्या वर्षीच्या ढगफुटीने जमीन खरडून गेली होती़ त्यातच यंदाचा खरीप व रबी हंगाम हातातून गेल्याने ते चिंतेत होते. त्यांच्यावर बँकेचे व खासगी कर्ज देखील आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे़वसमत (जि. हिंगोली) तालुक्यातील कागबन येथील ३२ वर्षीय रघुनाथ रामराव ढवळे यांनी रविवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, आर्थिक व मुलीच्या लग्नाची चिंता यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे मृताचा भाऊ सदाशिव ढवळे यांनी सांगितले आहे. तर, हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस येथील गोविंद विठ्ठल गोरे (४०) यांनी नापिकी आणि खाजगी कर्जाला कंटाळून रविवारी विष द्राव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.दुबार पेरणी करूनही पीक आले नाही़ त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा व कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी विष प्राशन करुन ५ डिसेंबर रोजी आत्महत्या केली़ त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, सहा बहिणी असा परिवार आहे. पीक हातचे गेल्याने ते चिंतेत होते़ ६ डिसेंबर रोजी त्यांनी विष प्राशन केले. (प्रतिनिधी)