लातूर : जिल्हा परिषदेने टंचाई निवारणासाठी ७९६ गावांत एक हजार ३७४ जलसाठा अधिग्रहणाद्वारे तर ३०० गावांमध्ये ३४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असून, त्यावर १६ कोटी ८१ लाखांचा खर्च झाला आहे़ मात्र त्यातील ८ कोटींचा निधी मिळाला तर उर्वरित ८ कोटी ८१ लाख रुपये रखडल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ लातूर जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ पंचायत समितीमार्फत तालुक्यांतील वाडी-तांडे व गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे़ खासगी विहीर व विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, विंधन विहिरी घेणे, नळयोजना विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक योजना करणे, विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, प्रगतिपथावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे आदी कामे सुरू आहेत़ एक हजार ८३७ ठिकाणी सुरू असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर १,६८१़२५ कोटींचा खर्च झाला असून, त्यापैकी ८ कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडे आला आहे़ सदरील निधी पंचायत समितीकडे वर्ग केला तर उर्वरित ८ कोटींचा निधी पाठपुरावा करूनही रखडल्याने अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ (प्रतिनिधी)>१० कोटींची मागणीटंचाई निवारणासाठी जि.प.कडून थकीत ८ कोटी व इतर २ कोटी अशा १० कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तो निधी अद्यापही न मिळाल्याने गैरसोय होत असल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता बी़ एऩ लाटकर यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्याचे आठ कोटी रखडले!
By admin | Updated: May 30, 2016 03:39 IST