शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास होणारे 8 फायदे

By admin | Updated: April 27, 2016 17:02 IST

भारतात फार पूर्वीपासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा आहे, त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 27 - आजकाल तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी पिणे म्हणजे आऊटडेटेड झालं आहे. फ्रीज आल्यापासून तांब्याच्या भांड्याचा वापर बंदच झाला आहे. शहरांमध्ये तर तांब्याची भांडी कोणाच्या घरात पाहणं दुर्मिळच झालं आहे. तांब्याची भांडी नामशेष होऊ लागली आहेत. कदाचित अनेकांना माहित नसेल पण भारतात फार पूर्वीपासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा आहे. त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास अनेक फायदे होतात जे अनेकांना माहित नसावेत. तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे शरिरासाठी खूपच लाभदायक आहे. नेमके काय फायदे आहेत याची माहिती जाणून घेऊया...
 
1) रक्त वाढते 
दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास यामधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करेल. यामुळे अॅनिमियाचा धोका टळतो.
 
2) सांधेदुखी दूर होते
रोज सकाळ - संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होतील आणि आराम मिळेल.
 
3) ह्रदयविकार दूर राहतात
तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेले पामी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि ह्रदय मजबूत होते.
 
4) जखम ठीक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी-बँक्टेरियल गुण जखम लवकर ठीक करण्यास मदत करतात. एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
 
5) थायरॉइड
लवकर वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे ही थायरॉइडची प्रमुक लक्षणे आहेत. तांब्यामधील कॉपर थायरॉक्सीन हार्मोनला संतुलित ठेवते. यामुळे थायरॉइडचा धोका दूर होतो. 
 
6) कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स पर्याप्त प्रमाणात असतात, जे कॅन्सरशी लढण्यात सहायक ठरतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी राहतो.
 
7) पाचन क्रिया व्यवस्थित राहते
अ‍ॅसिडिटी,गॅस किंवा पोटाची दुसरी समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. आयुर्वेदानुसार जर तुम्हाला शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याची इच्छा असेल तर तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे पाचन क्रिया व्यवस्थित राहते.
 
8) नेहमी तरुण दिसण्यासाठी
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास त्वचेतील लुळेपणा दूर होतो. डेड स्किन (मृत त्वचा) निघून जाते आणि चेहरा नेहमी उजळ दिसतो.