शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."
2
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
3
रतन टाटांच्या मृत्युपत्रात सातासमुद्रापलीकडील व्हिला; खरेदीसाठी कोण इच्छुक? पैसे कोणाला मिळणार?
4
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
5
Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल!
6
नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलं; शिंदेसेनेचा अजित पवार गटाला दे धक्का
7
Maithili Thakur : "मी व्हेकेशन, आराम विसरली, मला फक्त..."; आमदार होताच जोरदार कामाला लागल्या मैथिली ठाकूर
8
IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?
9
Putin: रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुतिन सकारात्मक; पण झेलेन्स्कींसमोर ठेवली 'अशी' अट!
10
तुमची जुनी आणि फाटकी अंतर्वस्त्रे देशाच्या अर्थव्यवस्थेचं सिक्रेट सांगतात! काय आहे 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स'?
11
Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!
12
Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक
13
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लेकीचं ठेवलं हे युनिक नाव, जाणून घ्या नावाचा अर्थ
14
ड्रोन हल्ल्यात ३ चीनी इंजिनिअर ठार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सोन्याच्या खाणीत काम करत होते
15
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
16
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
17
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
18
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण
19
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
20
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीत घेतले ७९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश

By admin | Updated: July 15, 2017 05:23 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. पहिल्या फेरीत ७९ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागातर्फे देण्यात आली आहे, तर तब्बल ७५ हजार ९३७ विद्यार्थ्यांचे पहिल्या यादीत नाव आले असूनही त्यांनी प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही.अकरावी प्रवेशाची पहिली यादी सोमवार, १० जुलैला सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती, पण नवीन कंपनीच्या दिरंगाईमुळे मध्यरात्रीपर्यंत संकेतस्थळावर डेटा अपलोड झालेला नव्हता. त्यामुळे पहिली यादी रात्री १ वाजता संकेतस्थळावर जाहीर झाली. त्यानंतरही गोंधळ कायम होता. अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी प्रवेशाचे मेसेज आले नव्हते. विद्यार्थी आणि पालकांनी यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर, गुरुवारी संपणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. वाणिज्य शाखेत सर्वाधिक म्हणजे, ९२ हजार ८३ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला होता. त्यापैकी फक्त ४३ हजार २९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत ४७ हजार ४२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी २६ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, २० हजार ५५३ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. एचएसव्हीसी अभ्यासक्रमाला १ हजार ८५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी ६०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पसंतीच्या महाविद्यालयालाच विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले. पहिल्या यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे सोमवार, १७ जुलैला सायंकाळी ५ वाजता दुसरी यादी जाहीर होणार आहे. दुसरी यादी वेळेत जाहीर होईल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. >पहिल्या यादीत दीड लाख विद्यार्थ्यांची नावे पहिल्या गुणवत्ता यादीत तब्बल १ लाख ५६ हजार ५०७ विद्यार्थ्यांची नावे होती. त्यापैकी ७५ हजार ९३७ विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. ८५४ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, २४२ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. कला शाखेत पहिल्या यादीत एकूण १५ हजार ९१२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी ९ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ६ हजार ७४७ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागीच झाले नाहीत. ४० विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले असून, ३१ जणांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.