शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

अकरावीत घेतले ७९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश

By admin | Updated: July 15, 2017 05:23 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. पहिल्या फेरीत ७९ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागातर्फे देण्यात आली आहे, तर तब्बल ७५ हजार ९३७ विद्यार्थ्यांचे पहिल्या यादीत नाव आले असूनही त्यांनी प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही.अकरावी प्रवेशाची पहिली यादी सोमवार, १० जुलैला सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती, पण नवीन कंपनीच्या दिरंगाईमुळे मध्यरात्रीपर्यंत संकेतस्थळावर डेटा अपलोड झालेला नव्हता. त्यामुळे पहिली यादी रात्री १ वाजता संकेतस्थळावर जाहीर झाली. त्यानंतरही गोंधळ कायम होता. अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी प्रवेशाचे मेसेज आले नव्हते. विद्यार्थी आणि पालकांनी यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर, गुरुवारी संपणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. वाणिज्य शाखेत सर्वाधिक म्हणजे, ९२ हजार ८३ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला होता. त्यापैकी फक्त ४३ हजार २९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत ४७ हजार ४२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी २६ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, २० हजार ५५३ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. एचएसव्हीसी अभ्यासक्रमाला १ हजार ८५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी ६०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पसंतीच्या महाविद्यालयालाच विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले. पहिल्या यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे सोमवार, १७ जुलैला सायंकाळी ५ वाजता दुसरी यादी जाहीर होणार आहे. दुसरी यादी वेळेत जाहीर होईल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. >पहिल्या यादीत दीड लाख विद्यार्थ्यांची नावे पहिल्या गुणवत्ता यादीत तब्बल १ लाख ५६ हजार ५०७ विद्यार्थ्यांची नावे होती. त्यापैकी ७५ हजार ९३७ विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. ८५४ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, २४२ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. कला शाखेत पहिल्या यादीत एकूण १५ हजार ९१२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी ९ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ६ हजार ७४७ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागीच झाले नाहीत. ४० विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले असून, ३१ जणांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.