शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

अकरावीत घेतले ७९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश

By admin | Updated: July 15, 2017 05:23 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. पहिल्या फेरीत ७९ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागातर्फे देण्यात आली आहे, तर तब्बल ७५ हजार ९३७ विद्यार्थ्यांचे पहिल्या यादीत नाव आले असूनही त्यांनी प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही.अकरावी प्रवेशाची पहिली यादी सोमवार, १० जुलैला सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती, पण नवीन कंपनीच्या दिरंगाईमुळे मध्यरात्रीपर्यंत संकेतस्थळावर डेटा अपलोड झालेला नव्हता. त्यामुळे पहिली यादी रात्री १ वाजता संकेतस्थळावर जाहीर झाली. त्यानंतरही गोंधळ कायम होता. अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी प्रवेशाचे मेसेज आले नव्हते. विद्यार्थी आणि पालकांनी यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर, गुरुवारी संपणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. वाणिज्य शाखेत सर्वाधिक म्हणजे, ९२ हजार ८३ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला होता. त्यापैकी फक्त ४३ हजार २९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत ४७ हजार ४२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी २६ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, २० हजार ५५३ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. एचएसव्हीसी अभ्यासक्रमाला १ हजार ८५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी ६०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पसंतीच्या महाविद्यालयालाच विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले. पहिल्या यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे सोमवार, १७ जुलैला सायंकाळी ५ वाजता दुसरी यादी जाहीर होणार आहे. दुसरी यादी वेळेत जाहीर होईल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. >पहिल्या यादीत दीड लाख विद्यार्थ्यांची नावे पहिल्या गुणवत्ता यादीत तब्बल १ लाख ५६ हजार ५०७ विद्यार्थ्यांची नावे होती. त्यापैकी ७५ हजार ९३७ विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. ८५४ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, २४२ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. कला शाखेत पहिल्या यादीत एकूण १५ हजार ९१२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी ९ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ६ हजार ७४७ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागीच झाले नाहीत. ४० विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले असून, ३१ जणांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.