शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७८ बोगस शिक्षण संस्था!

By admin | Updated: March 21, 2017 04:17 IST

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांची मान्यता नसलेली राज्यांत २३ बोगस विद्यापीठे आहेत. त्यांना पदव्या देण्याचा अधिकार नाही

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीविद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांची मान्यता नसलेली राज्यांत २३ बोगस विद्यापीठे आहेत. त्यांना पदव्या देण्याचा अधिकार नाही, तसेच आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ची मान्यता नसलेल्या देशात ३४१ संस्था व महाविद्यालये आहेत, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ करीत बिनबोभाट त्यांनी आपला कारभार चालवला आहे. अशी विद्यापीठे व तंत्रशिक्षण संस्थांची त्वरित चौकशी करून त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवावी, अशा सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत, अशी माहिती मनुष्यबळ विकास राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी सोमवारी राज्यसभेत दिली. यूजीसीची मान्यता नसलेल्या २३ बोगस विद्यापीठांपैकी ७ बोगस विद्यापीठे दिल्लीत आहेत, तर महाराष्ट्रात नागपूर येथे राजा अरेबिक विद्यापीठालाही मान्यता नाही. याशिवाय ३४१ संस्था व महाविद्यालयांना एआयसीटीईची मान्यता नाही. यापैकी दिल्लीत ६६ तर मुंबई आणि महाराष्ट्रात मिळून ७७ संस्था आहेत. महाराष्ट्रातल्या बोगस संस्थांमध्ये मुंबईत ४१, नवी मुंबईत ११, ठाण्यात ११, कल्याणला २ असून, पुण्यात ७, नाशिक जिल्ह्यात ३, कोल्हापूर, अहमदनगर व औरगाबाद येथे प्रत्येकी १ अशी त्यांची विभागणी आहे. यूजीसी व एआयसीटीईच्या वेबसाइट्सवर या बोगस विद्यापीठे व मान्यता नसलेल्या विद्यापीठे, तंत्रशिक्षण संस्था व महाविद्यालयांची संपूर्ण यादी आली आहे. पुढील महिन्यात महाविद्यालये व विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपण प्रवेश घेत असलेले विद्यापीठ, संस्था अथवा महाविद्यालयास यूजीसी अथवा एआयसीटीईची मान्यता आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे, असे सांगून महेंद्रनाथ पांडे म्हणाले की, दिल्लीखेरीज, मुंबई, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, प.बंगाल या ठिकाणी बोगस विद्यापीठे व बोगस तंत्रशिक्षण संस्थाचा सुळसुळाट झाला आहे. पदव्या म्हणजे रद्दीच-या शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्या अथवा प्रमाणपत्रांची किंमत रद्दी कागदापेक्षा अधिक नाही. या सर्व बाबींची माहिती यूजीसी व एआयसीटीईने आपल्या वेबसाइटवर दिली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सावध राहावे, असेही मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.