शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

७७८ महाविद्यालयांचे होणार आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:29 IST

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व ७७८ महाविद्यालये आणि संस्थांचे त्रयस्थ शैक्षणिक आॅडिट करण्यात येणार असून त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी एका टास्क फोर्सची स्थापना केली.

विशेष प्रतिनिधीमुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व ७७८ महाविद्यालये आणि संस्थांचे त्रयस्थ शैक्षणिक आॅडिट करण्यात येणार असून त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी एका टास्क फोर्सची स्थापना केली.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प; मुंबईचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.आर.एस.माळी, वझे केळकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.गोविंद पारटकर आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव व्यंकटरमणी हे या टास्क फोर्सचे सदस्य तर राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने हे सदस्य सचिव असतील.युजीसी, एआयसीटीई, बार कौन्सिल आॅफ इंडिया, कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर, एनसीटीई आदी प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्थांमध्ये भौतिक सोईसुविधा आहेत की नाही याचे आॅडिट केले जाईल. महाविद्यालये व त्यांचे अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा तुकड्या आदींचे संलग्नीकरण व त्यांचे नूतनीकरण विहित तरतुदींनुसार करण्यात येत आहे व त्यानुसार आवश्यक त्या शुल्काचा भरणा/वसुली विद्यापीठाकडे मजा होत आहे की नाही याचेही आॅडिट केले जाईल.या शिवाय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव हे या समितीचे सदस्य तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव हे सदस्य सचिव असतील. टास्कफोर्सला आवश्यक तेव्हा मार्गदर्शन करणे, टास्क फोर्सने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे कृति-आराखडा (अ‍ॅक्शन प्लॅन) तयार करून कुलपतींकडे सादर करणे, ज्या संस्थांनी नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस करण्याचे अधिकार समितीला असतील.प्रचलित यंत्रणा व कार्यपद्धतीमध्ये करावयाच्या सुधारणा आणि उपाययोजना सुचविणे आणि महाविद्यालयांनी नियमांच्या उल्लंघनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विद्यापीठास मार्गदर्शक सूचना देण्याचे काम ही समिती करेल.विद्यार्थी व पालकांना विनाकारण मनस्तापमुंबई विद्यापीठाने वापरलेल्या आॅन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीवर टॅग केलेल्या शिक्षकांचा अत्यल्प सहभाग राहिल्याने तसेच हे मूल्यांकन वेळेत न होऊ शकल्याने विद्यार्थी व पालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला, असे खापरही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने फोडले आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयnewsबातम्या