शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

बियाण्यांचे ७६६ नमुने अपात्र

By admin | Updated: June 27, 2016 22:43 IST

कृषी उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तापूर्वक असणे आवश्यक असते. पेरणीनंतर बियाण्यांची उगवण व्यवस्थित झाली नाही तर शेतकऱ्याला

बीज परीक्षण प्रयोगशाळेचा रिपोर्ट : शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

नागपूर : कृषी उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तापूर्वक असणे आवश्यक असते. पेरणीनंतर बियाण्यांची उगवण व्यवस्थित झाली नाही तर शेतकऱ्याला फार मोठे नुकसान होते. त्यामुळे बियाणे उत्पादक व पुरवठादार यांना बियाणे कायदा-१९६६ नुसार गुणवत्तापूर्वक बियाणे पुरवठा करणे बंधनकारक ठरते. अशा बियाणे उत्पादकांना बीज परीक्षण प्रयोगशाळेत आपल्या बियाण्यांची तपासणी करून घ्यावी लागते. यासाठी विदर्भात केवळ नागपुरात बीज परीक्षण प्रयोगशाळा असून, या अंतर्गत ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. येथे तीन प्रकारच्या बियाणे नमुन्यांची तपासणी केल्या जाते. त्यानुसार या प्रयोगशाळेत मागील वर्षभरात एकूण १८ हजार १३८ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ७६६ नमुने अपात्र ठरले आहेत. यापैकी ६,२७८ नमुने कृषी विभागातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी गोळा करून त्यापैकी तब्बल १०७ नमुने अपात्र ठरले आहेत. अनेकदा या बीज परीक्षणाची गरज काय? असा शेतकरी प्रश्न उपस्थित करतात. मात्र जाणकारांच्या मते, जोपर्यंत बियाण्याची उगवण क्षमता माहीत होत नाही, तोपर्यंत प्रति एकर किती बियाणे पेरावे याचा अंदाज लावता येत नाही. शिवाय या तपासणीतून विक्रेते आणि शेतकरी यांना बियाण्यांची उगवण क्षमता, भौतिक शुद्घता, कीडग्रस्त प्रमाण आणि ओडीव्ही याचीही अचूक माहिती मिळते. त्यामुळे प्रत्येक बियाण्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे अनिवार्य ठरते. मागील वर्षी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण बियाण्यांपैकी ४.२२ टक्के बियाणे अपात्र ठरले होते. या उपरोक्त ते बियाणे छुप्या मार्गाने बाजारातून शेतकऱ्यांना विक्री केले जाऊ शकते, अशी बीज परीक्षण अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे, तरी शेतकऱ्यांनी अशा बियाण्यांपासून सावध राहिले पाहिजे. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील १ एप्रिल २०१६ ते १५ मे २०१६ दरम्यान एकूण १०९ नमुने तपासण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी एकही नमुना अपात्र ठरलेला नाही.