शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

बियाण्यांचे ७६६ नमुने अपात्र

By admin | Updated: June 27, 2016 22:43 IST

कृषी उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तापूर्वक असणे आवश्यक असते. पेरणीनंतर बियाण्यांची उगवण व्यवस्थित झाली नाही तर शेतकऱ्याला

बीज परीक्षण प्रयोगशाळेचा रिपोर्ट : शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

नागपूर : कृषी उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तापूर्वक असणे आवश्यक असते. पेरणीनंतर बियाण्यांची उगवण व्यवस्थित झाली नाही तर शेतकऱ्याला फार मोठे नुकसान होते. त्यामुळे बियाणे उत्पादक व पुरवठादार यांना बियाणे कायदा-१९६६ नुसार गुणवत्तापूर्वक बियाणे पुरवठा करणे बंधनकारक ठरते. अशा बियाणे उत्पादकांना बीज परीक्षण प्रयोगशाळेत आपल्या बियाण्यांची तपासणी करून घ्यावी लागते. यासाठी विदर्भात केवळ नागपुरात बीज परीक्षण प्रयोगशाळा असून, या अंतर्गत ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. येथे तीन प्रकारच्या बियाणे नमुन्यांची तपासणी केल्या जाते. त्यानुसार या प्रयोगशाळेत मागील वर्षभरात एकूण १८ हजार १३८ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ७६६ नमुने अपात्र ठरले आहेत. यापैकी ६,२७८ नमुने कृषी विभागातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी गोळा करून त्यापैकी तब्बल १०७ नमुने अपात्र ठरले आहेत. अनेकदा या बीज परीक्षणाची गरज काय? असा शेतकरी प्रश्न उपस्थित करतात. मात्र जाणकारांच्या मते, जोपर्यंत बियाण्याची उगवण क्षमता माहीत होत नाही, तोपर्यंत प्रति एकर किती बियाणे पेरावे याचा अंदाज लावता येत नाही. शिवाय या तपासणीतून विक्रेते आणि शेतकरी यांना बियाण्यांची उगवण क्षमता, भौतिक शुद्घता, कीडग्रस्त प्रमाण आणि ओडीव्ही याचीही अचूक माहिती मिळते. त्यामुळे प्रत्येक बियाण्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे अनिवार्य ठरते. मागील वर्षी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण बियाण्यांपैकी ४.२२ टक्के बियाणे अपात्र ठरले होते. या उपरोक्त ते बियाणे छुप्या मार्गाने बाजारातून शेतकऱ्यांना विक्री केले जाऊ शकते, अशी बीज परीक्षण अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे, तरी शेतकऱ्यांनी अशा बियाण्यांपासून सावध राहिले पाहिजे. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील १ एप्रिल २०१६ ते १५ मे २०१६ दरम्यान एकूण १०९ नमुने तपासण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी एकही नमुना अपात्र ठरलेला नाही.