शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

कल्याण-डोंबिवलीत तापाचे ७,५०९ रुग्ण

By admin | Updated: July 18, 2016 04:52 IST

कल्याण-डोंबिवली शहरांत आतापर्यंत सात हजार ५०९ जणांना तापाची लागण झाल्याची माहिती समोर

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत आतापर्यंत सात हजार ५०९ जणांना तापाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी १९ रुग्ण मलेरियाचे आहेत. मात्र, वातावरण बदलामुळे ‘व्हायरल फिव्हर’ सगळीकडेच असतो, असे सांगून साथ नसल्याचा दावा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. महापालिकेच्या प्रसिद्धिपत्रकात तापाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा सात हजार ५०९ इतका आहे. त्यात मलेरियाची लागण झालेल्यांची संख्या केवळ १९ इतकी आहे. सात हजार ५०९ रुग्णांचे रक्ताचे नमुने महापालिकेने गोळा केले आहेत. त्यासाठी जवळपास एक लाख ५७ हजार घरांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मात्र, कावीळ, डेंग्यू, गॅस्ट्रोचे किती रुग्ण आहेत, याची माहिती न देता शहरातील साथींचे वास्तव लपवण्याचा एक प्रयत्नच महापालिकेने केला आहे.मे महिन्यात पाणीटंचाई असताना कल्याण पूर्वेत दूषित पाण्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. कल्याण पूर्वेत मे महिन्यात कावीळची लागण झालेल्यांचा आकडा ७५ होता. त्यानंतर, १ ते १४ जुलैदरम्यान गॅस्ट्रो १७, कावीळ ४१ तर २७ जणांना विषमज्वराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. ही महापालिकेचीच आकडेवारी आहे. त्यात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा नमूद करण्यात आलेला नाही. दूषित पाण्यामुळे काविळीची लागण झाल्याचा मुद्दा कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला होता. स्वच्छता योग्य प्रकारे केली जात नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला होता. महापालिकेने तयार केलेल्या साथरोग कृती आराखड्याची अंमलबजावणीही होत नाही, असा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. परिणामी, साथीच्या रोगांचे रुग्ण वाढत आहेत.आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले की, २७ गावांत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा प्रत्यक्षात जास्त आहे. किमान १० जणांना ग्रामीण भागात डेंग्यूची लागण झाल्याचे वाटते. त्याला डॉक्टरांनी दुजोरा दिलेला नाही. ग्रामीण भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. इमारतींमध्ये तापाचे रुग्ण कमी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>महासभा गाजणारमहापालिकेतील भाजपा नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शैलेश धात्रक यांनी सोमवार, १८ जुलैला महापालिकेच्या महासभेत सभा तहकुबीची सूचना मांडली आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर उघड्यावर पदार्थ बनवून विकले जातात. त्यामुळे पावसाळ्यात साथीच्या रोगांना आमंत्रण मिळते. या गाड्या बंद करण्याची लेखी व तोेंडी तक्रार देऊनही प्रभाग अधिकारी त्याची दखल घेत नाहीत. जोपर्यंत उघड्यावर पदार्थ विकणाऱ्यांविरोधात पालिकेकडून ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत सभा तहकूब करावी, अशी मागणी धात्रक यांनी केली आहे.