शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत तापाचे ७,५०९ रुग्ण

By admin | Updated: July 18, 2016 04:52 IST

कल्याण-डोंबिवली शहरांत आतापर्यंत सात हजार ५०९ जणांना तापाची लागण झाल्याची माहिती समोर

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत आतापर्यंत सात हजार ५०९ जणांना तापाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी १९ रुग्ण मलेरियाचे आहेत. मात्र, वातावरण बदलामुळे ‘व्हायरल फिव्हर’ सगळीकडेच असतो, असे सांगून साथ नसल्याचा दावा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. महापालिकेच्या प्रसिद्धिपत्रकात तापाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा सात हजार ५०९ इतका आहे. त्यात मलेरियाची लागण झालेल्यांची संख्या केवळ १९ इतकी आहे. सात हजार ५०९ रुग्णांचे रक्ताचे नमुने महापालिकेने गोळा केले आहेत. त्यासाठी जवळपास एक लाख ५७ हजार घरांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मात्र, कावीळ, डेंग्यू, गॅस्ट्रोचे किती रुग्ण आहेत, याची माहिती न देता शहरातील साथींचे वास्तव लपवण्याचा एक प्रयत्नच महापालिकेने केला आहे.मे महिन्यात पाणीटंचाई असताना कल्याण पूर्वेत दूषित पाण्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. कल्याण पूर्वेत मे महिन्यात कावीळची लागण झालेल्यांचा आकडा ७५ होता. त्यानंतर, १ ते १४ जुलैदरम्यान गॅस्ट्रो १७, कावीळ ४१ तर २७ जणांना विषमज्वराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. ही महापालिकेचीच आकडेवारी आहे. त्यात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा नमूद करण्यात आलेला नाही. दूषित पाण्यामुळे काविळीची लागण झाल्याचा मुद्दा कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला होता. स्वच्छता योग्य प्रकारे केली जात नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला होता. महापालिकेने तयार केलेल्या साथरोग कृती आराखड्याची अंमलबजावणीही होत नाही, असा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. परिणामी, साथीच्या रोगांचे रुग्ण वाढत आहेत.आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले की, २७ गावांत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा प्रत्यक्षात जास्त आहे. किमान १० जणांना ग्रामीण भागात डेंग्यूची लागण झाल्याचे वाटते. त्याला डॉक्टरांनी दुजोरा दिलेला नाही. ग्रामीण भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. इमारतींमध्ये तापाचे रुग्ण कमी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>महासभा गाजणारमहापालिकेतील भाजपा नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शैलेश धात्रक यांनी सोमवार, १८ जुलैला महापालिकेच्या महासभेत सभा तहकुबीची सूचना मांडली आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर उघड्यावर पदार्थ बनवून विकले जातात. त्यामुळे पावसाळ्यात साथीच्या रोगांना आमंत्रण मिळते. या गाड्या बंद करण्याची लेखी व तोेंडी तक्रार देऊनही प्रभाग अधिकारी त्याची दखल घेत नाहीत. जोपर्यंत उघड्यावर पदार्थ विकणाऱ्यांविरोधात पालिकेकडून ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत सभा तहकूब करावी, अशी मागणी धात्रक यांनी केली आहे.