शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

७२ गावपाड्यांंत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: May 16, 2014 01:24 IST

वाडा तालुक्यातील भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तालुक्यातील ७२ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वसंत भोईर, वाडा -  वाडा तालुक्यातील भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तालुक्यातील ७२ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बहुतेक ग्रामपंचायतींनी जलस्वराज्य योजना घेतली असली तरी निकृष्ट दर्जाचे काम अन् त्यात ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला असून या योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. औद्योगिकीकरणामुळे रोलिंग मिल्स, शीतपेय बनवणार्‍या कंपन्यांना पाण्याची मोठी गरज असल्याने पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. मार्च महिन्यापासूनच नद्यांतील पाण्याची पातळी खाली जाते. त्यानंतर पाणीटंचाई जाणवत असल्याने खाजगी कूपनलिकेतून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. कोंढले (हंडीपाडा), चिखले (चिंचपाडा), सावरखांड, चेंदवली, डोंगगरपाडा, बोलखतरपाडा, तणोशी जामघर (कातकरीपाडा), वेहरोली (बोंद्रे आळी), कोंढले (रावतेपाडा), नांदणी (तांडबमाळ), गायगोढा (देऊळपाडा), गोºहाड, केळठण (सुदारपाडा), मांडवा (बालशेतपाडा), गारगाव-टोपलेपाडा, कातकरीपाडा, उज्जैनी (आंबेपाडा), वसराळे-नवापाडा, चारणवाडी, मांगरुळ आदी ७२ गावपाड्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. तालुक्यात जलस्वराज्य योजनेतून वेहरोली, कोना, कोंढला, आंबिस्ते आणि मोज तर आदिवासी उपयोजनेतून गुंजकाही, मांडवा, नारे, गोराड, दाभोण या पाच गावी पाण्यासाठी अंदाजे दीड कोटी खर्च झाला़ परंतु हा सर्व पाण्यात गेल्यात जमा आहे. येत्या आठ दिवसांत उपाययोजना केली नाही तर उपोषण करणार असल्याचा इशारा कोंढले येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.