शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत ७0 बळी

By admin | Updated: June 6, 2016 01:34 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल १३0 अपघात झाले असून, त्यात ७0 जणांचे बळी गेले आहेत

कमलाकर कांबळे,  नवी मुंबईमुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल १३0 अपघात झाले असून, त्यात ७0 जणांचे बळी गेले आहेत, तर जवळपास २५0 जण जखमी झाले आहेत. रविवारी शिवकर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांतील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने मुंबई-पुणे दु्रतगती महामार्ग तयार करण्यात आला. २00२ मध्ये ९४.५ किमी लांबीच्या या महामार्गाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मुंबई ते पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून थेट दोन तासांवर आला. याचा परिणाम म्हणून मागील चौदा वर्षांत या महामार्गावरील वाहतूक वाढली. सुसाट व अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्याही वाढली. विशेष म्हणजे पहिल्या दहा वर्षांत म्हणजे २00२ ते २0१२ या कालावधीत या महामार्गावर लहान-मोठे तब्बल १७५८ अपघात घडले होते. दिवसाआड होणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग असुरक्षित बनला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघातांची संख्या सत्तरच्या घरात गेली आहे, तर जवळपास अडीचशे जण कायमचे जायबंदी झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांतील मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), महिंद्रा आणि महिंद्रा लि. तसेच सेव्ह लाइफ फाउंडेशन यांच्यात फेब्रुवारी २0१६ मध्ये सामंजस्य करार झाला होता. एकत्रित सहकार्यातून पुढील तीन-चार वर्षांत महामार्गावरील अपघातांत मृतांची संख्या शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघातांची संख्या पाहता हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून आले आहे.अपघातांचा तपशील२९ एप्रिल २0१६ : खोपोली एक्झिट वळणावर कंटेनरची मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप व्हॅनला धडक, २ जण ठार१७ मार्च २0१६ : महामार्गावरील अडोशीजवळ खासगी बसची दुभाजकाला धडक, २ ठार, १५ जण जखमी१६ मे २0१६ : भरधाव एसटी बसची झाडाला धडक. दुपारी पावणे तीनची घटना. १५ प्रवासी जखमी२ जून २0१६ : भरधाव कारची रस्ता दुभाजकाला धडक, ३ ठार, तीन जखमी. अपघातग्रस्त एकाच कुटुंबातील ठाणे येथील रहिवासी होते.२ जून २0१६ : खासगी लक्झरी बसची ट्रकला धडक, पहाटे घडलेल्या या अपघातात ५ ठार, १६ जखमी५ जून २0१६ : महामार्गावरील शिवकर गावाजवळ लक्झरी बसची स्विफ्ट आणि इनोव्हा गाडीला धडक, १७ मृत, ४७ जखमी.