शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

हत्ती हल्ल्यात ७ मृत,१५ जखमी

By admin | Updated: November 22, 2014 00:15 IST

दहा वर्षातील स्थिती : नुकसानीची ८ हजार प्रकरणे दाखल, भरपाईपोटी पावणेदहा कोटींचे वाटप

अनंत जाधव -सावंतवाडी --सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींनी गेल्या दहा वर्षात, म्हणजेच सन २००४ पासून आजपर्यंत सात जणांचे बळी घेतले आहेत, तर १५ जणांना जखमी केले आहे. हत्ती नुकसानग्रस्तांची ७,९०६ प्रकरणे वनविभागाला प्राप्त झाली असून, नुकसान भरपाईपोटी पावणेदहा कोटी रुपये रक्क्कम अदा करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात तीन हत्तींचे वास्तव्य आहे. त्यापैकी एक कुडाळ तालुक्यात, तर दोन हत्ती कणकवली तालुक्यात असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.सन २००२ ते ०३ च्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून सहा हत्तींचा कळप तिलारी परिसरात दाखल झाला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षात या हत्तींनी अर्ध्याअधिक जिल्ह्यात आपले साम्राज्य पसरवले असून प्रत्येक तालुक्यात नुकसानी करत हत्तींचा कळप पुढेच्या ठिकाणी जातो. सध्या हत्तींनी आपला मोर्चा कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे व कणकवली तालुक्यातील डामरे-सावडाव भागात वळवला आहे. या ठिकाणी हत्तींनी भातशेती व केळीबागायतीचे प्रचंड नुकसान केले आहे. आतापर्यंत या हत्तीना परतविण्यासाठी वनविभागाने नवनवीन उपाय केले, मोहिमा राबवल्या. पण हे सर्व उपाय अपुरे पडले असून हत्तीनी एक प्रकारे वनविभागावर विजयच मिळवला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती दाखल झाल्यानंतर या हत्तीनी दोडामार्गमधुन नुकसान सत्रास सुरूवात केली. तर पहिला बळी शिरंगे येथील शंकर बाळा गावडे यांचा १० एप्रिल २००४ मध्ये घेतला. तेव्हापासून हत्ती हल्ल्यात मृत झालेल्यांची संख्या ७ जुलै २००७ पर्यंत ७ वर जाऊन पोहोचली आहे. तर जखमीची संख्या १५ च्या घरात जाऊन पोहोचली आहे. यामध्ये बुधवारी हत्ती हल्ल्यात जखमी झालेल्या वेताळबांबर्डे येथील वैभव गायकवाड याचाही समावेश आहे. हत्तीपासून बागायतीचे झालेल्या नुकसानीची आकडेवारी कोटीच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत वनविभागाकडे नुकसानीची ७,९०६ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्याप्रमाणे वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम अदा केली असून, ही रक्कम ९ कोटी ६९ लाख ५८ हजार रुपये एवढी आहे. सध्या हत्तींकडून नुकसानसत्र सुरूच असून यात वाढ होण्याची शक्यताही वनविभागाने व्यक्त केली आहे.दरम्यान, हत्तींच्या वावराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सध्या त्रस्त झाली आहे.हत्ती हल्ल्यात नुकसानीची प्रकरणे व अदा रक्कमवर्षप्रकरणेअदा रक्कम (रुपये)२००६-०७८४३१ कोटी ४३ लाख२००७-०८१५१०१ कोटी ५० लाख२००८-०९१४७७२ कोटी ६ हजार २००९-१०२८८७ लाख ६२ हजार२०१०-१११०२३१ कोटी २७ लाख२०११-१२५९९६४ लाख ४७ हजार२०१२-१३८७७१ कोटी १२ लाख ४३ हजार२०१३- १४८७७१ कोटी १२ लाख २०१४-१५५८१ ८३ लाख ३३ हजारहत्ती प्रश्न ठरतोय डोकेदुखीअपुरा कर्मचारी वर्ग, त्यात हत्ती बंदोबस्तासाठी दररोज कर्मचाऱ्यांची एक तुकडी जंगलात पाठवावी लागते त्यामुळे वनविभागापुढे अनेक प्रश्न निर्माण झाला आहे. हत्तींनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. नुकसान भरपाईपेक्षा मोहीम राबविली असती तर बरे झाले असते. पण ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय...’ अशीच काहीशी अवस्था वनविभागाची झाली आहे. हत्ती हल्ल्यातील मृत व्यक्तीनावतालुकादिनांकशंकर गावडेदोडामार्ग१० एप्रिल २००४ अशोक कुंभारकुडाळ ३० नोव्हेंबर २००६कृष्णा कदमकुडाळ१२ डिसेंबर २००७केशव उपरकरसावंतवाडी१८ आॅगस्ट २००८सीताराम परबकुडाळ१० एप्रिल २०१४मोहन सडवेलकरकुडाळ१८ एप्रिल २०१४ बाबू धुळू बुटेकुडाळ०७ जुलै २०१४हत्ती हल्ल्यातील जखमीचंद्रशेखर सावंत, रा. बांदा३१ जानेवारी २००६ सहदेव चांदेरकर, रा. आरोसबाग०२ मार्च २००६रवींद्र जळवी, रा. पिंगुळी३१ मार्च२००७पांडुरंग कुडतरकर, रा. भडगाव२९ एप्रिल २००७हेमंत धोंड, रा. वायगंणी ०३ एप्रिल २००७बाबाजी तारी, रा.ओटवणे १८ फेब्रुवारी २००८ विनायक कवठणकर, रा. शिरोडा२० सप्टेंबर २००९सुनिल कावळे, रा. आरवली२० सप्टेंबर २००९विलास येंडगे, रा. निळेली २० डिसेंबर २००९घन:श्याम बळीराम लाड, रा. निवजे १८ नोव्हेंबर २०११ बेनीत जॉकी डिसोजा, रा. निवजे १८ नोव्हेंबर २०११बाबूराव शिगार्डे, रा. निवजे २८ नोव्हेंबर २०१२विजया जाधव, रा. कसाल ०४ जून २०१४वैभव गायकवाड, रा. वेताळबांबर्डे १२ नोव्हेंबर २०१४