शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती हल्ल्यात ७ मृत,१५ जखमी

By admin | Updated: November 22, 2014 00:15 IST

दहा वर्षातील स्थिती : नुकसानीची ८ हजार प्रकरणे दाखल, भरपाईपोटी पावणेदहा कोटींचे वाटप

अनंत जाधव -सावंतवाडी --सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींनी गेल्या दहा वर्षात, म्हणजेच सन २००४ पासून आजपर्यंत सात जणांचे बळी घेतले आहेत, तर १५ जणांना जखमी केले आहे. हत्ती नुकसानग्रस्तांची ७,९०६ प्रकरणे वनविभागाला प्राप्त झाली असून, नुकसान भरपाईपोटी पावणेदहा कोटी रुपये रक्क्कम अदा करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात तीन हत्तींचे वास्तव्य आहे. त्यापैकी एक कुडाळ तालुक्यात, तर दोन हत्ती कणकवली तालुक्यात असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.सन २००२ ते ०३ च्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून सहा हत्तींचा कळप तिलारी परिसरात दाखल झाला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षात या हत्तींनी अर्ध्याअधिक जिल्ह्यात आपले साम्राज्य पसरवले असून प्रत्येक तालुक्यात नुकसानी करत हत्तींचा कळप पुढेच्या ठिकाणी जातो. सध्या हत्तींनी आपला मोर्चा कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे व कणकवली तालुक्यातील डामरे-सावडाव भागात वळवला आहे. या ठिकाणी हत्तींनी भातशेती व केळीबागायतीचे प्रचंड नुकसान केले आहे. आतापर्यंत या हत्तीना परतविण्यासाठी वनविभागाने नवनवीन उपाय केले, मोहिमा राबवल्या. पण हे सर्व उपाय अपुरे पडले असून हत्तीनी एक प्रकारे वनविभागावर विजयच मिळवला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती दाखल झाल्यानंतर या हत्तीनी दोडामार्गमधुन नुकसान सत्रास सुरूवात केली. तर पहिला बळी शिरंगे येथील शंकर बाळा गावडे यांचा १० एप्रिल २००४ मध्ये घेतला. तेव्हापासून हत्ती हल्ल्यात मृत झालेल्यांची संख्या ७ जुलै २००७ पर्यंत ७ वर जाऊन पोहोचली आहे. तर जखमीची संख्या १५ च्या घरात जाऊन पोहोचली आहे. यामध्ये बुधवारी हत्ती हल्ल्यात जखमी झालेल्या वेताळबांबर्डे येथील वैभव गायकवाड याचाही समावेश आहे. हत्तीपासून बागायतीचे झालेल्या नुकसानीची आकडेवारी कोटीच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत वनविभागाकडे नुकसानीची ७,९०६ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्याप्रमाणे वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम अदा केली असून, ही रक्कम ९ कोटी ६९ लाख ५८ हजार रुपये एवढी आहे. सध्या हत्तींकडून नुकसानसत्र सुरूच असून यात वाढ होण्याची शक्यताही वनविभागाने व्यक्त केली आहे.दरम्यान, हत्तींच्या वावराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सध्या त्रस्त झाली आहे.हत्ती हल्ल्यात नुकसानीची प्रकरणे व अदा रक्कमवर्षप्रकरणेअदा रक्कम (रुपये)२००६-०७८४३१ कोटी ४३ लाख२००७-०८१५१०१ कोटी ५० लाख२००८-०९१४७७२ कोटी ६ हजार २००९-१०२८८७ लाख ६२ हजार२०१०-१११०२३१ कोटी २७ लाख२०११-१२५९९६४ लाख ४७ हजार२०१२-१३८७७१ कोटी १२ लाख ४३ हजार२०१३- १४८७७१ कोटी १२ लाख २०१४-१५५८१ ८३ लाख ३३ हजारहत्ती प्रश्न ठरतोय डोकेदुखीअपुरा कर्मचारी वर्ग, त्यात हत्ती बंदोबस्तासाठी दररोज कर्मचाऱ्यांची एक तुकडी जंगलात पाठवावी लागते त्यामुळे वनविभागापुढे अनेक प्रश्न निर्माण झाला आहे. हत्तींनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. नुकसान भरपाईपेक्षा मोहीम राबविली असती तर बरे झाले असते. पण ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय...’ अशीच काहीशी अवस्था वनविभागाची झाली आहे. हत्ती हल्ल्यातील मृत व्यक्तीनावतालुकादिनांकशंकर गावडेदोडामार्ग१० एप्रिल २००४ अशोक कुंभारकुडाळ ३० नोव्हेंबर २००६कृष्णा कदमकुडाळ१२ डिसेंबर २००७केशव उपरकरसावंतवाडी१८ आॅगस्ट २००८सीताराम परबकुडाळ१० एप्रिल २०१४मोहन सडवेलकरकुडाळ१८ एप्रिल २०१४ बाबू धुळू बुटेकुडाळ०७ जुलै २०१४हत्ती हल्ल्यातील जखमीचंद्रशेखर सावंत, रा. बांदा३१ जानेवारी २००६ सहदेव चांदेरकर, रा. आरोसबाग०२ मार्च २००६रवींद्र जळवी, रा. पिंगुळी३१ मार्च२००७पांडुरंग कुडतरकर, रा. भडगाव२९ एप्रिल २००७हेमंत धोंड, रा. वायगंणी ०३ एप्रिल २००७बाबाजी तारी, रा.ओटवणे १८ फेब्रुवारी २००८ विनायक कवठणकर, रा. शिरोडा२० सप्टेंबर २००९सुनिल कावळे, रा. आरवली२० सप्टेंबर २००९विलास येंडगे, रा. निळेली २० डिसेंबर २००९घन:श्याम बळीराम लाड, रा. निवजे १८ नोव्हेंबर २०११ बेनीत जॉकी डिसोजा, रा. निवजे १८ नोव्हेंबर २०११बाबूराव शिगार्डे, रा. निवजे २८ नोव्हेंबर २०१२विजया जाधव, रा. कसाल ०४ जून २०१४वैभव गायकवाड, रा. वेताळबांबर्डे १२ नोव्हेंबर २०१४