शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

तब्बल ६७४ उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार

By admin | Updated: January 9, 2016 00:43 IST

ग्रामपंचायत निवडणुका : खर्च न दिल्याचे कारण, सुनावणी सुरू

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केलेला खर्च निर्धारित वेळेत न दिलेल्या जिल्ह्यातील१०६ ग्रामपंचायतींमधील ६७४ उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातील निवडून आलेल्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, तर उर्वरित उमेदवार पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्र होऊ शकतात. सध्या महसूल प्रशासनातर्फे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी देतील. जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींसाठी दि. २७ जुलै २०१५ ला मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारांनी निवडणूक खर्चाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे. खर्च न दिल्यास निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द होते. पराभूत उमेदवारास पुन्हा पाच वर्षांमध्ये निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांने खर्चाचा तपशील देण्यासंबंधी प्रशासनाने प्रभावी जागृती केली. प्रत्येक उमेदवारापर्यंत ही माहिती पोहोचविण्याकडे लक्ष वेधले. वेळेत खर्च न दिलेल्या उमेदवारांना नोटीस दिली तरीही खर्च देण्याकडे ६७४ उमेदवारांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, जिल्हा प्रशासन खर्च न दिलेल्या उमेदवारांची यादी तयार करून कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. चंदगड, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, आजरा, शिरोळ, गगनबावडा या तालुक्यांतील सर्व उमेदवारांनी खर्च दिले आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले, भुदरगड या तालुक्यांतील खर्च न दिलेल्या ग्रामपंचायतींमधील सदस्यांची सुनावणी पूर्ण झाली आहे. कागल तालुक्यातील सदस्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी काढतील. खर्च न दिलेल्यात पराभूत उमेदवारांची संख्या अधिक आहेत. यावरून निवडणूक लढवायची मात्र पराभूत झाल्यानंतर खर्च द्यायचा नाही अशीच मानसिकता अधिक असल्याचे स्पष्ट होते. विजयी उमेदवारांपैकी करवीर तालुक्यातील तिघांनी खर्च दिलेला नाही. सर्वाधिक करवीर तालुक्यात...ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च न दिलेल्या उमेदवारांची व कंसात ग्रामपंचायतींची संख्या अशी : शाहूवाडी (१७) ९८, पन्हाळा (२६) ७७, करवीर (३६) ३८१, हातकणंगले (१) १, भुदरगड (७) १३, कागल (१९) १०४.सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक लढविलेले आणि खर्च न दिलेल्या उमेदवारांची सुनावणी घेतली जात आहे. कागल वगळता उर्वरित तालुक्यांतील सुनावणी पूर्ण झाली आहे. आयोगाच्या नियमाप्रमाणे खर्च न दिलेल्या उमेदवारांवर कारवाई होईल. - किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)