शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ६७४ उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार

By admin | Updated: January 9, 2016 00:43 IST

ग्रामपंचायत निवडणुका : खर्च न दिल्याचे कारण, सुनावणी सुरू

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केलेला खर्च निर्धारित वेळेत न दिलेल्या जिल्ह्यातील१०६ ग्रामपंचायतींमधील ६७४ उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातील निवडून आलेल्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, तर उर्वरित उमेदवार पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्र होऊ शकतात. सध्या महसूल प्रशासनातर्फे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी देतील. जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींसाठी दि. २७ जुलै २०१५ ला मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारांनी निवडणूक खर्चाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे. खर्च न दिल्यास निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द होते. पराभूत उमेदवारास पुन्हा पाच वर्षांमध्ये निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांने खर्चाचा तपशील देण्यासंबंधी प्रशासनाने प्रभावी जागृती केली. प्रत्येक उमेदवारापर्यंत ही माहिती पोहोचविण्याकडे लक्ष वेधले. वेळेत खर्च न दिलेल्या उमेदवारांना नोटीस दिली तरीही खर्च देण्याकडे ६७४ उमेदवारांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, जिल्हा प्रशासन खर्च न दिलेल्या उमेदवारांची यादी तयार करून कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. चंदगड, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, आजरा, शिरोळ, गगनबावडा या तालुक्यांतील सर्व उमेदवारांनी खर्च दिले आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले, भुदरगड या तालुक्यांतील खर्च न दिलेल्या ग्रामपंचायतींमधील सदस्यांची सुनावणी पूर्ण झाली आहे. कागल तालुक्यातील सदस्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी काढतील. खर्च न दिलेल्यात पराभूत उमेदवारांची संख्या अधिक आहेत. यावरून निवडणूक लढवायची मात्र पराभूत झाल्यानंतर खर्च द्यायचा नाही अशीच मानसिकता अधिक असल्याचे स्पष्ट होते. विजयी उमेदवारांपैकी करवीर तालुक्यातील तिघांनी खर्च दिलेला नाही. सर्वाधिक करवीर तालुक्यात...ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च न दिलेल्या उमेदवारांची व कंसात ग्रामपंचायतींची संख्या अशी : शाहूवाडी (१७) ९८, पन्हाळा (२६) ७७, करवीर (३६) ३८१, हातकणंगले (१) १, भुदरगड (७) १३, कागल (१९) १०४.सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक लढविलेले आणि खर्च न दिलेल्या उमेदवारांची सुनावणी घेतली जात आहे. कागल वगळता उर्वरित तालुक्यांतील सुनावणी पूर्ण झाली आहे. आयोगाच्या नियमाप्रमाणे खर्च न दिलेल्या उमेदवारांवर कारवाई होईल. - किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)