शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

तब्बल ६७४ उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार

By admin | Updated: January 9, 2016 00:43 IST

ग्रामपंचायत निवडणुका : खर्च न दिल्याचे कारण, सुनावणी सुरू

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केलेला खर्च निर्धारित वेळेत न दिलेल्या जिल्ह्यातील१०६ ग्रामपंचायतींमधील ६७४ उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातील निवडून आलेल्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, तर उर्वरित उमेदवार पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्र होऊ शकतात. सध्या महसूल प्रशासनातर्फे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी देतील. जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींसाठी दि. २७ जुलै २०१५ ला मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारांनी निवडणूक खर्चाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे. खर्च न दिल्यास निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द होते. पराभूत उमेदवारास पुन्हा पाच वर्षांमध्ये निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांने खर्चाचा तपशील देण्यासंबंधी प्रशासनाने प्रभावी जागृती केली. प्रत्येक उमेदवारापर्यंत ही माहिती पोहोचविण्याकडे लक्ष वेधले. वेळेत खर्च न दिलेल्या उमेदवारांना नोटीस दिली तरीही खर्च देण्याकडे ६७४ उमेदवारांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, जिल्हा प्रशासन खर्च न दिलेल्या उमेदवारांची यादी तयार करून कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. चंदगड, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, आजरा, शिरोळ, गगनबावडा या तालुक्यांतील सर्व उमेदवारांनी खर्च दिले आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले, भुदरगड या तालुक्यांतील खर्च न दिलेल्या ग्रामपंचायतींमधील सदस्यांची सुनावणी पूर्ण झाली आहे. कागल तालुक्यातील सदस्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी काढतील. खर्च न दिलेल्यात पराभूत उमेदवारांची संख्या अधिक आहेत. यावरून निवडणूक लढवायची मात्र पराभूत झाल्यानंतर खर्च द्यायचा नाही अशीच मानसिकता अधिक असल्याचे स्पष्ट होते. विजयी उमेदवारांपैकी करवीर तालुक्यातील तिघांनी खर्च दिलेला नाही. सर्वाधिक करवीर तालुक्यात...ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च न दिलेल्या उमेदवारांची व कंसात ग्रामपंचायतींची संख्या अशी : शाहूवाडी (१७) ९८, पन्हाळा (२६) ७७, करवीर (३६) ३८१, हातकणंगले (१) १, भुदरगड (७) १३, कागल (१९) १०४.सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक लढविलेले आणि खर्च न दिलेल्या उमेदवारांची सुनावणी घेतली जात आहे. कागल वगळता उर्वरित तालुक्यांतील सुनावणी पूर्ण झाली आहे. आयोगाच्या नियमाप्रमाणे खर्च न दिलेल्या उमेदवारांवर कारवाई होईल. - किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)