शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

रेल्वे मार्गावर ७ दिवसांत ६६ जणांचा मृत्यू

By admin | Updated: June 27, 2016 04:50 IST

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अपघात सत्र सुरुच आहे. गेल्या सात दिवसांत तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अपघात सत्र सुरुच आहे. गेल्या सात दिवसांत तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून अपघात कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकलमधून पडणे, रेल्वे रुळ ओलांडताना, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे इत्यादी कारणांमुळे प्रवाशांचे अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. हे अपघात रोखण्यासाठी प्रवास करताना नियम मोडल्याचे सांगत रेल्वे सुरक्षा दलाकडूनही प्रवाशांवर कठोर कारवाई केली जाते. मात्र पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण होत आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी या तीन दिवसांतच एकूण ३३ जणांचे बळी गेले आहेत. तर गेल्या सहा महिन्यांत १ हजार ४७३ प्रवाशांचे बळी गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डोंबिवलीकर भावेश नकाते या तरुणाचा काही महिन्यांपूर्वीच गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. त्या घटनेचा बराच गाजावाजा झाल्यानंतर रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानंतर पश्चिम व मध्य रेल्वेवर लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना, रेल्वेचे अधिकारी यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या. अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना सूचवण्याचे काम या समितींवर होते. मात्र अपघात सत्र सुरुच असताना अजूनही ठोस अशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)>५६ जण जखमीउपाययोजना केल्याचा दावा रेल्वेकडून सातत्याने केला जात असला तरी अपघात कमी झालेले नाहीत. गेल्या सात दिवसांत अपघातांची संख्या पाहिल्यास तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५६ जण जखमी झाले आहेत.गेल्या आठवड्यातील शनिवारी १५ जणांचा तर त्याआधीच्या गुरुवारी १४ जणांचा मृत्यू झाला आहे.