शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

तत्पर अधिकाऱ्यामुळे ६३ कोटी रुपयांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 09:51 IST

राज्य शासनाला लाभ : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा हप्ताही होणार कमी

- योगेश बिडवई मुंबई : महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविणाºया नॅशनल इन्शूरन्स कंपनीला गेल्या सहा वर्षांत प्रीमिअमपोटी दिली गेलेली व खर्च न झालेली ६३.७८ कोटी रूपयांची ‘प्रसिद्धीची रक्कम’ राज्य सरकारने परत मिळविली आहे. एवढेच नव्हे तर यापुढे या योजनेचा प्रीमिअम २ टक्के कमी करून घेतल्याने योजनेचा खर्चही तेवढा कमी होणार आहे.गेली सहा वर्षे राज्य सरकार ही योजना उपरोक्त विमा कंपनीच्या माध्यमातून राबवित आहे. या संबंधीचा जो मूळ करार झाला त्यात असे ठरले होते, की कंपनीने सरकारकडून प्रीमिअमपैकी २ टक्के रक्कम योजनेच्या जाहिरात व प्रसिद्धीवर खर्च करावी. मात्र यंदाच्या जूनअखेरपर्यंत कंपनीकडे अशा प्रकारे खर्च केलेली ६३.७८ कोटी रुपयांची रक्कम अपेक्षित उद्देशासाठी खर्च न करता पडून आहे, असे जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निदर्शनास आले. कंपनीने हे पैसे परत करावेत असा शिंदे यांचा आग्रह होता. मात्र ही रक्कम संबंधित वित्तीय वर्ष संपल्यानंतर ‘व्यपगत’ झाली, ती परत करता येणार नाही, असे कंपनीचे म्हणणे होते.अखेर शिंदे व कंपनीचे मुंबई विभागीय व्यवस्थापक आणि योजना प्रमुख ए. राजगोपालन यांच्यात ८ आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत या अखर्चित रकमेबाबत सहमतीने निर्णय झाला. त्यानुसार कंपनी ही रक्कम १५ डिसेंबरअखेर चार मासिक हप्त्यात सरकारला परत करणार आहे. बैठकीत असेही ठरले की, यापुढे जाहिरात व प्रसिद्धीसाठी अशी रक्कम प्रीमिअममध्ये अंतर्भूत करण्यात येणार नाही. त्यामुळे योजनेचा प्रीमिअमच दोन टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. अशा प्रकारे सरकारचा दुहेरी लाभ झाला आहे. एक म्हणजे कंपनीस दिली गेलेली अनावश्यक रक्कम परत मिळणार आहे व दुसरे असे की, यापुढे प्रीमिअमही कमी भरावा लागेल.