शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

बियाणे-खतांच्या काळ्याबाजारावर ६२ पथकांचा ‘वॉच’!

By admin | Updated: May 23, 2017 01:41 IST

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत भरारी पथके गठित

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत ६२ भरारी पथके गठित करण्यात आली असून, बियाणे आणि खतांच्या विक्रीतील काळाबाजारावर या भरारी पथकांचे विशेष लक्ष राहणार आहे.पावसाळा तोंडावर आला असून, शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे व रासायनिक खतांची खरेदी शेतकऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे. बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी बियाणे आणि खतांच्या विक्रीतील काळाबाजारावर लक्ष ठेवण्यासाठी पाचही जिल्ह्यांत कृषी विभागामार्फत ६२ भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. त्यामध्ये तालुकास्तरीय ५६, जिल्हास्तरीय पाच आणि विभागस्तरीय एका भरारी पथकाचा समावेश आहे. बियाणे व खतांसंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास तातडीने दखल घेऊन, मोका पाहणी व तपासणी करणे, बोगस बियाणे आढळून आल्यास कारवाई करणे, संशयास्पद बियाणे आढळून आल्यास बियाण्याचे नमुने घेऊन संबंधितांवर कारवाई करणे, तसेच बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण झाल्यास संबंधित वरिष्ठांना माहिती देणे व उपाययोजना सुचविण्यासाठी ही भरारी पथके गठित करण्यात आली आहेत.गठित करण्यात आलेली जिल्हा-तालुकास्तरीय भरारी पथके!अमरावती - १५अकोला - ०८बुलडाणा- १४वाशिम - ०७यवतमाळ - १७विभागस्तरीय - ०१एकूण - ६२