शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

राज्यात ६० हजार, मुंबईत २५ हजार बोगस डॉक्टर

By admin | Updated: July 7, 2015 04:10 IST

तापेने फणफणलात किंवा आजाराने ग्रासले म्हणून डॉक्टरकडे जावे आणि डॉक्टरच बोगस निघावा... तुमच्या आजूबाजूला असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पूजा दामले, मुंबईतापेने फणफणलात किंवा आजाराने ग्रासले म्हणून डॉक्टरकडे जावे आणि डॉक्टरच बोगस निघावा... तुमच्या आजूबाजूला असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राज्यात तब्बल ६० हजार आणि मुंबईत २५ हजार डॉक्टर बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड यांनीच लोकमतला ही माहिती दिली. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनीही या आकडेवारीला दुजोरा दिला आहे. विविध जिल्ह्यांच्या ठिकाणांहून आम्हाला वेळोवेळी इनपुट्स मिळत असतात. त्याआधारे राज्यातील बोगस डॉक्टरांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. यातील बहुतेक डॉक्टर पश्चिम बंगालमधून दाखल होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कंपाउंडर म्हणून अनेक व्यक्ती दवाखान्यात अनेक वर्षे काम करत असतात. वर्षानुवर्षे तेच काम केल्याने डॉक्टर कोणत्या आजाराच्या वेळी कोणत्या गोळ्या देतात, याचा अंदाज त्यांना येतो. एवढ्या माहितीच्या आधारावर हे कंपाउंडर थेट डॉक्टरांच्या थाटात व्यवसाय सुरू करतात, अशी माहितीही वैद्यकीय परिषदेच्या सूत्रांनी दिली. ग्रामीण भागात चालणारे बहुतेक दवाखाने हे अशाच व्यक्तींद्वारे चालवले जातात. लवकर बरे वाटावे तसेच कमी पैशांत औषधे उपलब्ध होत असल्याने या तथाकथित डॉक्टरांकडे मोठी गर्दी होते. प्रत्यक्षात या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा मान्यताप्राप्त वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला नसतो. तसेच त्यांची कोणत्याही वैद्यकीय परिषदेत नोंदणीदेखील नसते. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही गल्ल्यागल्ल्यांमध्ये असे दवाखाने आता सुरू आहेत. बोगस डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय ज्ञान नसताना ते सरधोपटपणे औषधे देतात. यामुळे राज्यातील जनतेचा जीव धोक्यात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जेवढे अधिकृत तेवढेच अनधिकृत !> महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही बोगस डॉक्टर मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. च्ग्रामीण भागातील दवाखान्याच्या बोर्डवरूनदेखील या परिस्थितीचा अंदाज येतो. राज्यात जितके नोंदणीकृत डॉक्टर आहेत, तितकेच बोगस डॉक्टर असू शकतात.> ‘सरकारने गांभीर्याने पाहावे’एकट्या दिल्लीत ४० हजार बोगस डॉक्टर होते. ते प्रमाण पाहता मुंबईसह राज्यातील बोगस डॉक्टरचे प्रमाण हे किती तरी अधिक असण्याचीच शक्यता आहे. सरकारने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून शोधप्रक्रिया राबवण्याची गरज आहे.  - डॉ. शिवकुमार उत्तुरे, सदस्य, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद> जिवाला धोकातज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, कोणतेही औषध देताना रुग्णाचा आजार, त्याचे कारण, वय अशा अनेक गोष्टींचा विचार करून डोस दिला जातो. फक्त आजार पाहून औषध दिल्यास रुग्णाच्या जिवाला धोका असतो.