शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राज्यात ६० हजार, मुंबईत २५ हजार बोगस डॉक्टर

By admin | Updated: July 7, 2015 04:10 IST

तापेने फणफणलात किंवा आजाराने ग्रासले म्हणून डॉक्टरकडे जावे आणि डॉक्टरच बोगस निघावा... तुमच्या आजूबाजूला असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पूजा दामले, मुंबईतापेने फणफणलात किंवा आजाराने ग्रासले म्हणून डॉक्टरकडे जावे आणि डॉक्टरच बोगस निघावा... तुमच्या आजूबाजूला असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राज्यात तब्बल ६० हजार आणि मुंबईत २५ हजार डॉक्टर बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड यांनीच लोकमतला ही माहिती दिली. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनीही या आकडेवारीला दुजोरा दिला आहे. विविध जिल्ह्यांच्या ठिकाणांहून आम्हाला वेळोवेळी इनपुट्स मिळत असतात. त्याआधारे राज्यातील बोगस डॉक्टरांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. यातील बहुतेक डॉक्टर पश्चिम बंगालमधून दाखल होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कंपाउंडर म्हणून अनेक व्यक्ती दवाखान्यात अनेक वर्षे काम करत असतात. वर्षानुवर्षे तेच काम केल्याने डॉक्टर कोणत्या आजाराच्या वेळी कोणत्या गोळ्या देतात, याचा अंदाज त्यांना येतो. एवढ्या माहितीच्या आधारावर हे कंपाउंडर थेट डॉक्टरांच्या थाटात व्यवसाय सुरू करतात, अशी माहितीही वैद्यकीय परिषदेच्या सूत्रांनी दिली. ग्रामीण भागात चालणारे बहुतेक दवाखाने हे अशाच व्यक्तींद्वारे चालवले जातात. लवकर बरे वाटावे तसेच कमी पैशांत औषधे उपलब्ध होत असल्याने या तथाकथित डॉक्टरांकडे मोठी गर्दी होते. प्रत्यक्षात या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा मान्यताप्राप्त वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला नसतो. तसेच त्यांची कोणत्याही वैद्यकीय परिषदेत नोंदणीदेखील नसते. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही गल्ल्यागल्ल्यांमध्ये असे दवाखाने आता सुरू आहेत. बोगस डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय ज्ञान नसताना ते सरधोपटपणे औषधे देतात. यामुळे राज्यातील जनतेचा जीव धोक्यात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जेवढे अधिकृत तेवढेच अनधिकृत !> महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही बोगस डॉक्टर मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. च्ग्रामीण भागातील दवाखान्याच्या बोर्डवरूनदेखील या परिस्थितीचा अंदाज येतो. राज्यात जितके नोंदणीकृत डॉक्टर आहेत, तितकेच बोगस डॉक्टर असू शकतात.> ‘सरकारने गांभीर्याने पाहावे’एकट्या दिल्लीत ४० हजार बोगस डॉक्टर होते. ते प्रमाण पाहता मुंबईसह राज्यातील बोगस डॉक्टरचे प्रमाण हे किती तरी अधिक असण्याचीच शक्यता आहे. सरकारने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून शोधप्रक्रिया राबवण्याची गरज आहे.  - डॉ. शिवकुमार उत्तुरे, सदस्य, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद> जिवाला धोकातज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, कोणतेही औषध देताना रुग्णाचा आजार, त्याचे कारण, वय अशा अनेक गोष्टींचा विचार करून डोस दिला जातो. फक्त आजार पाहून औषध दिल्यास रुग्णाच्या जिवाला धोका असतो.