शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

झाराप-पत्रादेवी मार्गासाठी ६० मीटर भूसंपादन होणार

By admin | Updated: May 20, 2015 00:09 IST

विनायक राऊत : नुकसानभरपाईसाठी एक हजार कोटींची तरतूद

कणकवली : झाराप-पत्रादेवी मार्ग ४५ मीटर रुंदीचा असला तरी आता सर्व्हीस रोडसाठी ६० मीटरचे भूसंपादन केले जाणार आहे. चौपदरीकरणातील नुकसानभरपाईसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, भरपाई देताना हात आखडता न घेण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण ही कोकणवासीयांना देणगी मिळालेली असून, सर्वांना विश्वासात घेण्यात येईल, असे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेवेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवा सेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, तालुकाप्रमुख सचिन सावंत उपस्थित होते. रायगड येथील चौपदरीकरणातील चुका टाळण्यासाठी महसूल विभागाने सोयीने प्रक्रिया राबवावी. प्रत्येक जिल्ह्याच्या प्राधिकाऱ्याला आपल्या भागातील सर्वांना विश्वासात घेऊन कामकाजाची (पान ८ वर)पद्धत समजावून सहकार्य मिळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार नीतेश राणे यांनाही बैठक घेऊन विश्वासात घेण्यात येईल. महामार्गावर स्थानिक, विद्यार्थी, गुरे आदींसाठी आवश्यक त्या ठिकाणी बॉक्सेल व ओव्हरब्रीज टाकण्यात येतील. ८० टक्के संपादनाचे काम पूर्ण झाले की निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सप्टेंबरपर्यंत मोबदला देण्यात येईल, अशी माहिती खासदारांनी दिली. जैतापूरप्रश्नी पंतप्रधानांचे आश्वासन जैतापूर अणुऊर्जाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत अनेक वावड्या उठत आहेत. परंतु, पंतप्रधान मोदी यांना आम्ही प्रकल्प का नको हे समजावून सांगितले. त्यावर मी यातील तज्ज्ञ नाही. यासंबंधी समितीचा अहवाल आल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला चर्चेला बोलवेन, असे आश्वासन दिल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. आघाडी सरकारसारखे राज्याने केंद्राचा प्रकल्प म्हणून हांजी हांजी करू नये. भाजपच्याच एका केंद्रीय कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याने नितीन गडकरींना जैतापूर प्रकल्प नको, असे पत्राने कळविले होते. झोन ४ च्या अतिनिकट जैतापूर प्रदेश येतो आणि अणुऊर्जा प्रकल्पासाठी सुरक्षित नाही. याकडे सरकारचे दुर्लक्ष घातक ठरेल, असा अहवाल रोममधील एआयजीपी या संस्थेने दिला आहे. शिवसेना सोडवणार प्रश्नशिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पाणी व वीज समस्येला प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध माध्यमातून वीज प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार असून, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडवण्यात येणार आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनातून उभा राहिलेला सुमारे १० कोटी रुपये निधी व खासदार निधी जिल्हानिहाय खर्च केला जाणार आहे.