शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ६० टक्के घरे शौचालयांविना

By admin | Updated: August 12, 2015 03:18 IST

टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस) या संस्थेच्या वतीने अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा विभागांतील ९६० गावांतील शौचालयांचा वापर व पाणीपुरवठ्याच्या

-  तेजस वाघमारे, मुंबईटाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस) या संस्थेच्या वतीने अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा विभागांतील ९६० गावांतील शौचालयांचा वापर व पाणीपुरवठ्याच्या सोयींबाबत नागरिकांकडून माहिती घेण्यात ंआली. या सर्वेक्षणानुसार सुमारे ६० टक्के घरांमध्ये शौचालये नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शौचालयांच्या वापराबाबत राज्यात राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने घेण्याचे ठरविले. त्यासाठी ही पाहणी करण्यात आली. या पाहणीनुसार कोकण विभागातील ६४.१ टक्के लोक शौचालयांचा वापर करीत असून, इतर विभागांच्या तुलनेत हा विभाग शौचालय वापराच्या बाबतीत आघाडीवर आहे.राज्यातील घरगुती शौचालयांचा वापर, शाळा-बालवाडींमधील शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी योजनांची सद्य:स्थिती या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. कोकण विभागातील ६४.१ टक्के नागरिक शौचालयाचा वापर करतात. त्याखालोखाल अमरावती विभागातील ५२.७ टक्के नागरिक शौचालयांचा वापर करीत असल्याचे टिसच्या अहवालात म्हटले आहे. नागरिकांना विचारण्यात आलेल्या माहितीनुसार गावांतील सुमारे ३५ टक्के शौचालये शासकीय योजनांमधून बांधण्यात आली आहेत. सामाजिक वर्गवारीनुसार एससी प्रवर्गातील केवळ ११.७ टक्के लोक शौचालयांचा वापर करीत आहेत, तर एसटी २०.८ टक्के आणि बीसी ३८.१ टक्के आणि खुल्या प्रवर्गातील ३०.४ टक्के लोक शौचालयांचा वापर करीत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.पाणी, अपूर्ण कामे, विजेअभावी शौचालयांचा वापर होत नसल्याची कारणे असू शकतात, असे टिसचे प्राध्यापक रमेश शक्तिवेल यांनी सांगितले.शौचालय वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी केली पाहिजे, असे या अहवालात सुचविण्यात आले आहे.