शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठनावर शेतक-यांना सहा टक्के व्याज

By admin | Updated: July 31, 2015 22:39 IST

पहिल्या वर्षाचे व्याज माफ, नवीन कर्जावर द्यावे लागणार होते १२ टक्के व्याज.

विवेक चांदूरकर/अकोला : पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्‍यांना गतवर्षी दिलेले पीककर्ज वसूल न करता या कर्जाचे पाच वर्षांकरिता पुनर्गठन करून, नवीन कर्जवाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पाच वर्षांकरिता पुनर्गठित केलेल्या कर्जावर शेतकर्‍यांना १२ टक्के व्याज द्यावे लागणार होते; मात्र यामध्ये बदल करून शेतकर्‍यांना पुनर्गठित कर्जावरील पहिल्या वर्षीचे व्याज माफ करण्यात आले आहे. पुढील चार वर्षांसाठी १२ टक्के नव्हे तर सहा टक्के व्याज शेतकर्‍यांना भरावे लागणार आहे. २0१४ - १५ या वर्षातील पीककर्जाचे व्याजासह पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी रूपांतरण करण्याबाबत विभागामार्फत यापूर्वीच सहकारी बँकांना व व्यापारी बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांनी जून व जुलै २0१५ मध्ये सुमारे २५00 कोटी कर्जाचे रूपांतरण केले. टंचाईग्रस्त भागातील बँकांमार्फत सुमारे ६00 कोटी अल्प मुदत कर्जाचे रूपांतरण होण्याची शक्यता आहे. या कर्जाची परतफेड सन २0१५-१६ या वर्षांपासून पाच वर्षात करावयाची आहे. त्यानुसार या कर्जाचा पहिला हप्ता जून २0१६ मध्ये देय होणार आहे. रूपांतरित कर्जावर विविध बँकांकडून सुमारे ११.५ ते १२ टक्के व्याज दर आकारण्यात येते. पीककर्जाच्या तुलनेत रूपांतरित कर्जाचा व्याजदर जास्त असल्यामुळे टंचाईग्रस्त भागातील शेतकर्‍यांना व्याजाचा अधिक भार सोसावा लागतो. अशा शेतकर्‍यांच्या रूपांतरित कर्जावरील व्याजाचा काही भार शासनामार्फत सोसण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार चार वर्षांचे सहा टक्के दराने होणारे व्याज शासनामार्फत शेतकर्‍यांच्यावतीने बँकांना अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.