पुणो : पुण्यात काही महिन्यांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असलेल्या 6 बांगलादेशींना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीकांत निमसे यांनी सहाही जणांना 15 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
रब्बी अर्शब शेख (25), तुषार कादर शेख (25), जमाल रोहल अमीन शेख (22), फुलमियाँ तालीब मुल्ला (26), राजू तोहीन मुल्ला (19) व अजमल युसूफ गाजी (45, सर्व रा. बांगलादेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पुण्यात विनापरवाना वास्तव्य करत असल्याची माहिती फरासखाना पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अनिता खेडकर यांना मिळाली होती. तसेच ते बुधवार पेठेत किरकोळ काम करून आपली उपजीविका भागवत असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार पोलीस कर्मचा:यांच्या मदतीने त्यांनी आारोपींकडे पारपत्रबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे भारताचे नागरिक असल्याबाबतचे कोणतेही पुरावे मिळून आले नाही. अधिक चौकशी केली असता आरोपींपैकी तीन जण एक महिन्यापासून, तर इतर आरेापी सहा महिन्यांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपींनी भारतात प्रवेश कसा केला, यासाठी त्यांना कोणी मदत केली याबाबत तपास करण्यासाठी सरकारी वकील सुचित्र नरोटे यांनी 6 जणांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. (प्रतिनिधी)