शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

मराठवाड्यात ५८ लाख लोक टँकरग्रस्त

By admin | Updated: May 24, 2016 02:56 IST

पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणी पुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक राहिल्याने

औरंगाबाद : पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणी पुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक राहिल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच ५८ लाख लोकांना ३,६८१ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. मे अखेरपर्यंत टँकरचा आकडा ४ हजारांपर्यंत जाण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६०० गावे, १८ लाख लोकसंख्या आणि ८०० टँकरची वाढ झाली आहे. यंदाचा दुष्काळ मागच्या वर्षीच्या तुलनेत भयावह असल्याचे आकड्यांवरून दिसते. पारा ४२ डिग्री सेल्सियसपर्यंत गेल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत. दोन हजार ८४९ गावांना ३,६८१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १३३ गावे आणि १६७ टँकर वाढले आहेत. वैशाख महिना सरत असून आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात लोकांना वणवण करावी लागणार, हे निश्चित. १,९२५ गावांसाठी ७,४५६ विहिरी विभागीय प्रशासनाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच ६०० गावे नव्याने दुष्काळाच्या गर्तेत आली आहेत. गेल्या महिन्यात दोन हजार ६० गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. (प्रतिनिधी)