शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

राज्यात सरासरीच्या ५८ टक्केच पाऊस

By admin | Updated: September 17, 2015 01:35 IST

राज्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्केच पाऊस झाला आहे. धरणांमध्ये सरासरी ४९ टक्के पाणी शिल्लक असले तरी मराठवाड्यातील धरणांमध्ये ८ टक्केच पाणी आहे.

मुंबई : राज्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्केच पाऊस झाला आहे. धरणांमध्ये सरासरी ४९ टक्के पाणी शिल्लक असले तरी मराठवाड्यातील धरणांमध्ये ८ टक्केच पाणी आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली पण अलिकडे झालेल्या पावसाने किंचित दिलासा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या चार जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या २२ जिल्ह्यांमध्ये ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, यवतमाळ या ८ जिल्ह्यांत २६ ते ५० टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी फक्त एका तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ० ते २५ टक्के, ८८ तालुक्यात २६ ते ५० टक्के, १८० तालुक्यात ५१ ते ७५ टक्के, ६८ तालुक्यात ७६ ते १०० टक्के आणि १८ तालुक्यात तर १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. राज्यात मूग, उडीद, बाजरीच्या काढणीस सुरु वातखरीपाचे सरासरी क्षेत्र १३४ लाख ७० हजार हेक्टर असून ११ सप्टेंबर अखेर १३१ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ९७% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात कमी पर्जन्यमानामुळे पिकांची वाढ असमाधानकारक असून पिकांच्या पुढील वाढीसाठी पुरेशा पावसाची नितांत आवश्यकता आहे. (विशेष प्रतिनिधी)जलसाठ्यांमध्ये ४९ टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ७८ टक्के साठा होता. प्रकल्पातील विभागनिहाय आजचा आणि कंसात गतवर्षी याच दिवशीचा साठा ंअसा - मराठवाडा - ८ टक्के (४३), कोकण - ८७ टक्के (९३), नागपूर - ७५ टक्के (७९), अमरावती - ६२टक्के (७४), नाशिक - ४४ टक्के (७७) आणि पुणे - ४९ टक्के (९१), इतर धरणे - ७१ टक्के (९७) असा पाणीसाठा आहे. १५१५ गावे व ३२२७वाड्यांना १९९० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२ टँकरद्वारे पुरवठा करण्यात येत होता. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ५ सप्टेंबरपर्यंत १४ हजार ५३० कामे सुरू असून या कामांवर एक लाख १२ हजार ७८४ मजुरांची उपस्थिती आहे.