शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना

By admin | Updated: July 28, 2016 16:23 IST

शासनाने भू - विकास बँक बंद केल्याची घोषणा केली असून, या बँकेतील ५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना आहे. या कर्मचाऱ्यांनी अन्य कार्यालयांमध्ये समायोजन मागणी केली आहे.

विवेक चांदूरकरबुलडाणा : शासनाने भू - विकास बँक बंद केल्याची घोषणा केली असून, या बँकेतील ५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना आहे. या कर्मचाऱ्यांनी अन्य कार्यालयांमध्ये समायोजन मागणी केली आहे. मात्र, शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कधीकाळी राज्यात एक नंबर असलेली भू - विकास बँकेचे जाळे संपूर्ण राज्यात पसरले होते. मात्र, कालांतराने व्यावसायिक स्पर्धेत कमी पडल्यामुळे सदर बँक मागे पडली. भाजप व शिवसेनेच्या सरकारने भू - विकास बँक बंद करण्याची घोषणा केली. या बँकेत संपूर्ण राज्यात ५६० कर्मचारी आहेत. तसेच २५७१ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना ३६ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. ५६० कर्मचाऱ्यांचे शासनाने १७४ कोटींचे वेतन थकीत आहे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १८० कोटी शासनाला देणे आहे. शासनाने शेतकऱ्यांकडे थकीत असलेले कर्ज वसूल करून वेतन घेण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे बँक बंद झाल्याच्या घोषणेमुळे शेतकरी थकीत कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. २५७१ कर्मचारी वेतनाविनाच सेवानिवृत्त झाले आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. वेतन देण्याच्या मागणीकरिता तसेच अन्य खात्यात समायोजन न केल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांच्यावतीने देण्यात आला होता. तसेच काही कर्मचाऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली होती. त्यानंतरही शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलने केल्यावरही शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.आमदारांच्या पत्रांना केराची टोपलीभू - विकास बँकांमधील कर्मचाऱ्यांना वेतन देवून त्यांचे अन्य खात्यात समायोजन करण्याची मागणी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ, चिखलीचे आ. राहूल बोंद्रे व आ. डॉ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावर विधानभवनात अनेकदा आमदारांच्यावतीने आवाजही उठविण्यात आला आहे. मात्र,त्यानंतरही याप्रकरणी कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली. तर विरोधी व सत्ताधारी पक्षातील आमदारांच्याच पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली.- आमचे ३६ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. शासनाने बँक बंद झाल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे आम्हाला वुसली करण्याचे सांगत आहेत. राज्यातील ५६० कर्मचारी तसेच २५७१ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आलीआहे. शासनाने बँकेतील कर्मचाऱ्यांचे अन्य खात्यात समायोजन करायला हवे.- ए. एस. जाधव, शाखा व्यवस्थापक, भू - विकास बँक, बुलडाणा.