शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना

By admin | Updated: July 28, 2016 16:23 IST

शासनाने भू - विकास बँक बंद केल्याची घोषणा केली असून, या बँकेतील ५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना आहे. या कर्मचाऱ्यांनी अन्य कार्यालयांमध्ये समायोजन मागणी केली आहे.

विवेक चांदूरकरबुलडाणा : शासनाने भू - विकास बँक बंद केल्याची घोषणा केली असून, या बँकेतील ५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना आहे. या कर्मचाऱ्यांनी अन्य कार्यालयांमध्ये समायोजन मागणी केली आहे. मात्र, शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कधीकाळी राज्यात एक नंबर असलेली भू - विकास बँकेचे जाळे संपूर्ण राज्यात पसरले होते. मात्र, कालांतराने व्यावसायिक स्पर्धेत कमी पडल्यामुळे सदर बँक मागे पडली. भाजप व शिवसेनेच्या सरकारने भू - विकास बँक बंद करण्याची घोषणा केली. या बँकेत संपूर्ण राज्यात ५६० कर्मचारी आहेत. तसेच २५७१ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना ३६ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. ५६० कर्मचाऱ्यांचे शासनाने १७४ कोटींचे वेतन थकीत आहे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १८० कोटी शासनाला देणे आहे. शासनाने शेतकऱ्यांकडे थकीत असलेले कर्ज वसूल करून वेतन घेण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे बँक बंद झाल्याच्या घोषणेमुळे शेतकरी थकीत कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. २५७१ कर्मचारी वेतनाविनाच सेवानिवृत्त झाले आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. वेतन देण्याच्या मागणीकरिता तसेच अन्य खात्यात समायोजन न केल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांच्यावतीने देण्यात आला होता. तसेच काही कर्मचाऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली होती. त्यानंतरही शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलने केल्यावरही शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.आमदारांच्या पत्रांना केराची टोपलीभू - विकास बँकांमधील कर्मचाऱ्यांना वेतन देवून त्यांचे अन्य खात्यात समायोजन करण्याची मागणी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ, चिखलीचे आ. राहूल बोंद्रे व आ. डॉ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावर विधानभवनात अनेकदा आमदारांच्यावतीने आवाजही उठविण्यात आला आहे. मात्र,त्यानंतरही याप्रकरणी कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली. तर विरोधी व सत्ताधारी पक्षातील आमदारांच्याच पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली.- आमचे ३६ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. शासनाने बँक बंद झाल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे आम्हाला वुसली करण्याचे सांगत आहेत. राज्यातील ५६० कर्मचारी तसेच २५७१ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आलीआहे. शासनाने बँकेतील कर्मचाऱ्यांचे अन्य खात्यात समायोजन करायला हवे.- ए. एस. जाधव, शाखा व्यवस्थापक, भू - विकास बँक, बुलडाणा.