शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

५५० कोटींचे वीज शुल्क उद्योगांच्या घशात : काँग्रेस

By admin | Updated: February 9, 2016 01:16 IST

राज्य सरकारने सुमारे ५५० कोटी रुपयांचे वीज शुल्क बेकायदेशीरपणे १३०८ उद्योगांच्या घशात घालून सरकारी तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी

मुंबई : राज्य सरकारने सुमारे ५५० कोटी रुपयांचे वीज शुल्क बेकायदेशीरपणे १३०८ उद्योगांच्या घशात घालून सरकारी तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. दुष्काळाच्या नावाखाली सर्वसामान्यांवर कर लादण्याची तत्परता दाखविणारे सरकार धनदांडग्यांच्या उद्योगांकडील कोट्यवधी रुपयांच्या आकारणीबाबत मात्र उदासीन का, अशी विचारणाही त्यांनी केली.ते म्हणाले, वितरणमुक्त प्रवेश अर्थात ओपन अ‍ॅक्सेसद्वारे वीज वापरास महाराष्ट्रातील उद्योगांना परवानगी आहे. या पद्धतीनुसार आॅक्टोबर २०१४पासून आजमितीस महाराष्ट्रातील १३०८ उद्योगांना सुमारे ६६२३ दशलक्ष युनिट्सचा वीजपुरवठा झाला. मुंबई विद्युत शुल्क अधिनियम १९५८मधील कलम ३मध्ये वीजवापरावर शुल्क आकारणीची तरतूद आहे. उद्योगांनी वापरलेली वीज कोणत्याही मार्गाने किंवा कोणत्याही राज्यातून उपलब्ध झालेली असली तरी त्यावर ही आकारणी देय आहे. त्यानुसार ६६२३ दशलक्ष युनिट्सवर वीज वितरण मंडळाच्या ८ रुपये दराने प्रति युनिट आकारणी व ९.३ टक्के दराने वीज शुल्क वसूल करायला हवे होते. ही रक्कम सुमारे ४९३ कोटी रुपयांच्या घरात आहे. या रकमेवर वीज विक्रीकर म्हणून सुमारे ६० कोटी रुपये वसूल करायला हवे होते. ही एकूण रक्कम ५५० कोटी रुपये असून, एवढा प्रचंड महसूल शासनाने उद्योजकांच्या घशात घातला आहे, असा आरोपही सावंत यांनी केला. (प्रतिनिधी)