शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आतड्याच्या कृमीमुळे ५५ टक्के बालकांना रक्ताक्षय

By admin | Updated: August 30, 2016 16:54 IST

शहरासह ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी शुध्द पाण्याचा अभाव आहे. त्यामुळे बालकांमध्ये आतड्याचा कृमी दोष आढळतो. या कृमीमुळे जवळपास ५५ टक्के बालकांना रक्ताक्षय होवून त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो

आरोग्य विभागाचे अभियान : जंतनाशक गोळ्या देणार
हर्षनंदन वाघ / ऑनलाइन लोकमत -
बुलडाणा, दि. 30 - शहरासह ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी शुध्द पाण्याचा अभाव आहे. त्यामुळे बालकांमध्ये आतड्याचा कृमी दोष आढळतो. या कृमीमुळे जवळपास ५५ टक्के बालकांना रक्ताक्षय होवून त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. अशा बालकांना रक्ताक्षय होवू नये म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने २ व ७ सप्टेंबर रोजी जंतनाशक गोळी देण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात १ ते १९ वयोगटातील किमान २४१ दशलक्ष बालकांमध्ये आतड्यांचा  कृमीदोष आढळून येतो. बालकांमध्ये होणारा दीघर्कालीन कृमीदोष हा मुलांना कुपोषित करणारा असल्यामुळे राज्यात २ सप्टेंबर हा राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना शाळेतच जंतनाशक गोळ्या या दिवशी दिल्यानंतर किमान दोन तास या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याचे आदेशात म्हटले आहे.  यासदंर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाने २७ आॅगस्ट रोजी घेतलेल्या वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून २ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जतंनाशक दिन असल्यामुळे जंताच्या गोळ्या वाटपाची मोहिम युध्दस्तरावर राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या दिवशी विद्यार्थी उपस्थित नसल्यास ७ सप्टेंबर रोजी पुन्हा जंतनाशक औषधींची मात्रा देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
 
पोळा सणावर परिणाम होण्याची शक्यता
विदर्भातील शेतकºयांच्या जीव्हाळ्याचा सण असलेल्या पोळ्याच्या दुसºया दिवशी तान्हा पोळ्याला विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. पोळा सणानिमित्त अनेक विद्यार्थी गावाकडे जातात. तसेच ते तान्हा पोळ्याचा उत्सवात भाग घेतात. त्यामुळे तान्हा पोळ्याच्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती किती राहिल, अशा प्रश्न उपस्थित होत असून या उत्सवाचा आरोग्य विभागाच्या मोहिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
दुषित पाण्यामुळे लहान बालकांमध्ये आतड्याचा कृमीदोष आढळतो. त्यामुळे रक्ताक्षय आदी आजार होतात. यासाठी २ व ७ सप्टेंबर रोजी ही राष्ट्रीय जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविली जाणार आहे. १ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या शाळेतच द्याव्या लागणार आहेत.
- डॉ.शिवाजीराव पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.
 
जंतनाशक गोळ्या वाटपाच्या मोहिमेत आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांसह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. त्याचा फायदा १ ते १९ वर्षाच्या बालकांना होणार असून कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
- डॉ.अरूण जवंजाळ, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, हतेडी बु., ता.बुलडाणा.