शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शहरातून अद्याप ५५ अल्पवयीन बालके बेपत्ता

By admin | Updated: July 11, 2017 03:33 IST

अल्पवयीन मुले बेपत्ता असल्याच्या प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अल्पवयीन मुले बेपत्ता असल्याच्या प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला. पोलिसांच्या तपास कार्यावर पालक समाधानी आहेत का? हे देखील त्यांनी पालकांसोबतही सुसंवाद साधून जाणून घेतले. सद्यस्थितीला आयुक्तालय क्षेत्रातून अद्यापही बेपत्ता असलेल्या ५५ बालकांचा शोध घेण्याच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.केंद्र शासनाच्या निदेशानुसार राज्यात ‘मुस्कान आॅपरेशन तीन’ हा उपक्रम राबवला जात आहे. हरवलेल्या अल्पवयीन बालकांच्या विशेष शोधमोहिमेच्या या उपक्रमात पहिल्याच वर्षी नवी मुंबई पोलिसांनी राज्यात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. शहरातून अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रकार सुरूच आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार १८ वर्षांखालील मुलगा अथवा मुलगी हरवल्यास त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला जात आहे. अशा गुन्ह्यांची दखल घेत पोलिसांकडून देखील तपासाला प्राधान्य दिले जात आहे. तर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक पथक देखील याकामी सक्रिय आहे. नवी मुंबई आयुक्तालयातून चार वर्षांत सुमारे ८०० बालके हरवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी सुमारे ७४५ बालकांचा शोध लागलेला आहे. मात्र अद्यापही ५५ बालकांचा शोध लागलेला नसून त्यामध्ये सुमारे ३० मुलींचा समावेश आहे. काही मुले घरगुती वादातून स्वत:हून पळालेली आहेत, तर काही व्यसनाधीन होवून गुन्हेगारी प्रवृत्ती जडल्याने घर सोडून गेली आहेत. त्यापैकी काहींना यापूर्वी पोलिसांनी शोधून पालकांच्या ताब्यात दिल्यानंतरही पुन्हा ती पळालेली आहेत. त्याशिवाय प्रेमात फूस लावून पळवलेल्या काही अल्पवयीन मुलींचाही त्यात समावेश आहे.मागील सुमारे तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले हे गुन्हे निकाली निघावेत यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे प्रयत्नशील आहेत. त्याकरिता सोमवारी कळंबोली पोलीस मुख्यालय येथे हरवलेल्या बालकांचे पालक व तपास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. आयुक्त नगराळे यांच्यासह सह आयुक्त प्रशांत बुरडे, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, उपआयुक्त राजेंद्र माने, डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह ४० हून अधिक पालक व सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते. यावेळी नगराळे यांनी प्रत्येक गुन्ह्याची सखोल चौकशी करून तपास अधिकाऱ्याकडून गुन्ह्याचा सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच पोलिसांच्या तपासकार्यावर पालक समाधानी आहेत का ? याची चौकशी केली. तर हरवलेली ही मुले सापडावीत याकरिता त्यांच्याविषयीची काही माहिती मिळतेय काय या अनुषंगाने देखील पालकांसोबत चर्चा करण्यात आली. नवी मुंबई आयुक्तालयातून चार वर्षांत सुमारे ८०० बालके हरवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी सुमारे ७४५ बालकांचा शोध लागलेला आहे.